आरोग्य

पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी करावयाचे काही उपाय

सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पोट साफ झालं की आपल्यालाही फ्रेश वाटतं. शरीरातील अनावश्यक घटक शरीराबाहेर टाकणं ही आपलं आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची क्रिया असते.

पण सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही की आपल्याला दिवसभर अस्वस्थ आणि आळसावल्यासारखं होत राहतं. बद्धकोष्ठता, पाणी कमी पिणे, आहाराच्या चुकीच्या पद्धती, ताणतणाव यांसारख्या गोष्टींमुळे पोट साफ होण्यात अडथळे येतात. मग कधी आपण घरगुती उपाय करतो नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेतो. पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती.

१) दही आणि जवस: दह्यामध्ये असलेले प्रोबायोटीक घटक असतात, पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी हे घटक अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे पोट साफ होत नसेल तर दह्याचा आहारात अवश्य समावेश करायला हवा. तर जवसामध्ये सोल्यूबल फायबर असते जे पाण्यात विरघळते आणि विष्ठा मऊ करण्याचे काम करते. त्यामुळे जवसाची चटणी, लाडू या गोष्टींचाही आहारात समावेश असावा.

२) आवळा ज्यूस: ३० मिलीग्रॅम आवळ्याचा रस पाण्यात मिक्स करुन सकाळी उठल्या उठल्या घेतला तर पोट साफ होण्यास त्याचा चांगला उपयोग होतो.

३) दूध आणि तूप: तूप हे शरीरात वंगणासारखे काम करते. त्यामुळे पोटात साठलेले अनावश्यक घटक शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. म्हणून रात्री झोपताना कपभर गरम दुधात १ चमचा तूप घालून घेतल्यास पोट साफ होण्यास मदत होते.

४) पालेभाज्या: पालक, ब्रोकोली किंवा इतर पालेभाज्यांमध्ये फक्त फायबरचे प्रमाण जास्त असते असे नाही. तर या भाज्यांमध्ये फोलेट, व्हिटॅमिन सी आणि के हे घटक योग्य प्रमाणात असतात. या घटकांमुळेही पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट साफ होण्याची क्रिया सोपी होते. म्हणून आहारात पालेभाज्यांचा अवश्य समावेश करा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

31 मिनिटे ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

21 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

21 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

21 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

23 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago