१) भुजंगासन:- केल्यामुळे तुमचे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. भुजंगासन करण्यासाठी आधी तुम्ही पोटावर झोपा नंतर दोन्ही हात छातीवरच्या बाजूला ठेवा. आणि त्यानंतर हळूवार श्वास घेत हळूहळू शरीर वर उचला. हा प्रकार करत असताना तुमची नाभी सुद्धावर उचलली जाईल याचा प्रयत्न करा. त्यानंतर नॉर्मल श्वास घेत आपल्या शरीराला सरूवातीच्या स्थितीत आणून ठेवा. हे आसन १० ते १२ वेळा करा असे केल्यास पोटावरची चरबी निघून जाण्यास मदत होईल.
2) उष्ट्रासन:- करण्यासाठी पायांना लांब करून बसा आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला वाकवा. तुमच्या टाचा मागच्या भागाला टच होईल असे ठेवा. हे करत असताना श्वास सोडत असताना कमरेच्या मागच्या भागाला मागे ढकला मग उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा. किंवा समान पकडलं तरी चालेल. या गोष्टीकडे लक्ष असू द्या की खाली वाकत असताना मानेला त्रास होईल अशी हालचाल असू नये हे आसन ३ ते ४ वेळा दररोज करा. हे आसन केल्याने कंबरेचा आणि पोटाचा आकार कमी होण्यास मदत होईल.
३) नौकासन:- सर्व प्रथम पोटावर झोपा. पाय जुळलेले असावे. हात शरीराजवळ असावेत. पूर्ण श्वास सोडावा आणि श्वास घेत दोन्ही हात आणि पाय एकाचवेळी जमिनीपासून 30 अंश वर उचलावे. म्हणजे संपूर्ण शरीराचा बॅलन्स पोटावर आले पाहिजे ह्या स्थितीत थोडे थांबावे आणि सावकाश आसन सोडावे. वजन कमी होते आणि तुम्ही वजनावर नियंत्रण मिळवून पाहिजे तशी फिगर मिळवू शकता.
सूर्यनमस्कार:- सूर्यनमस्कार शास्त्रोक्त (पूरक कुंभक रेचक) या पद्धतीने सातत्य पूर्वक केल्यास वजन कमी होण्यास खूप चांगला फायदा होतो वजन कमी होण्याबरोबरच पोटावरील, सीटवरील आणि मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी, सूर्यनमस्कार सारखा दुसरा व्यायाम नाही.
प्राणायाम:- समस्त शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कपालभाती व अनुलोंमविलोम हा रामबाण उपाय मानला जातो. सतत या पध्दतीने योगा केल्यास आपल्याला चांगले परिणाम दिसायला लागतात.
रात्रीचे उशिराचे जेवण:- रात्री उशीरा जेवण केल्याने पोटावरील चरबी वाढते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी किमान २ तास तुमचे जेवण झालेले पाहिजे. तेही नेहमीच्या जेवणापेक्षा अर्धे जेवण संध्याकाळी आठ पूर्वी आठ नंतर जेवणार असाल तर शक्यतो रात्रीचे जेवण टाळावे.
शतपावली:- रात्री जेवणानंतर आपण लागलीच झोपतो व पर्यायी आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी तयार होते, पर्यायाने ती चरबी आपल्याला पोटावर दिसते. जेवण केल्यानंतर कमीत कमी आपण शंभर पावले तरी चालले पाहिजे. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर थोडावेळ का होईना फिरायला जाण्याची सवय लावा.
(सोशल मीडियावरुन साभार)
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…