आरोग्य

पोटाची चरबी आणि मांड्या कमी करणे काही नियम व घरगुती उपाय…

१) भुजंगासन:- केल्यामुळे तुमचे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. भुजंगासन करण्यासाठी आधी तुम्ही पोटावर झोपा नंतर दोन्ही हात छातीवरच्या बाजूला ठेवा. आणि त्यानंतर हळूवार श्वास घेत हळूहळू शरीर वर उचला. हा प्रकार करत असताना तुमची नाभी सुद्धावर उचलली जाईल याचा प्रयत्न करा. त्यानंतर नॉर्मल श्वास घेत आपल्या शरीराला सरूवातीच्या स्थितीत आणून ठेवा. हे आसन १० ते १२ वेळा करा असे केल्यास पोटावरची चरबी निघून जाण्यास मदत होईल.

2) उष्ट्रासन:- करण्यासाठी पायांना लांब करून बसा आणि डाव्या पायाच्या गुडघ्याला वाकवा. तुमच्या टाचा मागच्या भागाला टच होईल असे ठेवा. हे करत असताना श्वास सोडत असताना कमरेच्या मागच्या भागाला मागे ढकला मग उजव्या हाताने डाव्या पायाला आणि डाव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडण्याचा प्रयत्न करा. किंवा समान पकडलं तरी चालेल. या गोष्टीकडे लक्ष असू द्या की खाली वाकत असताना मानेला त्रास होईल अशी हालचाल असू नये हे आसन ३ ते ४ वेळा दररोज करा. हे आसन केल्याने कंबरेचा आणि पोटाचा आकार कमी होण्यास मदत होईल.

३) नौकासन:- सर्व प्रथम पोटावर झोपा. पाय जुळलेले असावे. हात शरीराजवळ असावेत. पूर्ण श्वास सोडावा आणि श्वास घेत दोन्ही हात आणि पाय एकाचवेळी जमिनीपासून 30 अंश वर उचलावे. म्हणजे संपूर्ण शरीराचा बॅलन्स पोटावर आले पाहिजे ह्या स्थितीत थोडे थांबावे आणि सावकाश आसन सोडावे. वजन कमी होते आणि तुम्ही वजनावर नियंत्रण मिळवून पाहिजे तशी फिगर मिळवू शकता.

सूर्यनमस्कार:- सूर्यनमस्कार शास्त्रोक्त (पूरक कुंभक रेचक) या पद्धतीने सातत्य पूर्वक केल्यास वजन कमी होण्यास खूप चांगला फायदा होतो  वजन कमी होण्याबरोबरच पोटावरील, सीटवरील आणि मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी, सूर्यनमस्कार सारखा दुसरा व्यायाम नाही.

प्राणायाम:- समस्त शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी कपालभाती व अनुलोंमविलोम हा रामबाण उपाय मानला जातो. सतत या पध्दतीने योगा केल्यास आपल्याला ‍चांगले परिणाम दिसायला लागतात.

रात्रीचे उशिराचे जेवण:- रात्री उशीरा जेवण केल्याने पोटावरील चरबी वाढते. त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी किमान २ तास तुमचे जेवण झालेले पाहिजे. तेही नेहमीच्या जेवणापेक्षा अर्धे जेवण संध्याकाळी आठ पूर्वी आठ नंतर जेवणार असाल तर शक्यतो रात्रीचे जेवण टाळावे.

शतपावली:- रात्री जेवणानंतर आपण लागलीच झोपतो व पर्यायी आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी तयार होते, पर्यायाने ती चरबी आपल्याला पोटावर दिसते. जेवण केल्यानंतर कमीत कमी आपण शंभर पावले तरी चालले पाहिजे. त्यामुळे रात्रीचे जेवण झाल्यानंतर थोडावेळ का होईना फिरायला जाण्याची सवय लावा.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

9 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

9 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

9 तास ago

गणेशोत्सवाला जागतिक स्तरावर नवी ओळख देण्याचा उपक्रम; नामांकित मंडळांचा होणार सन्मान

मुंबई: मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कार्याचा गौरव…

10 तास ago

UPSC पूर्व परीक्षा प्रशिक्षणासाठी CET-2026 प्रवेश प्रक्रिया सुरू

मुंबई: उच्च शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई यांच्या माध्यमातून नागरी सेवा…

10 तास ago

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीची दखल; ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांवर कारवाईचे आदेश

प्रवाशांकडून जबरदस्तीने टिप वसुली, अतिरिक्त शुल्काच्या सक्तीविरोधात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश कल्याण: ॲप-आधारित…

10 तास ago