आरोग्य

प्लास्टिकच्या गाळणीने चहा गाळताय, रोज सकाळी तुमच्या पोटात जातंय प्लास्टिक

दररोज सकाळी आपण उठतो तेव्हा अंगात थोडा आळस असताेच. अंगातला हा आळस दूर तेव्हाच होतो जेव्हा आपण गरमागरम चहाचा पहिला घोट घेतो. दिवसाची सुरुवातच मुळी चहाच्या घोटाने होत असते. कोणी बिनासाखरेचा चहा घेतात, कोणी बिनदुधाचा चहा घेतात, कोणी मसाल्याचा चहा घेतात तर कोणी आलं घालून केलेला चहा पितात. पण काही अपवाद सोडले तर बहुतांश लोक सकाळी चहा घेतातच. पण चहा पिताना आपल्या पोटात फक्त चहाच जातो आहे ना की त्यासोबत असे काही घटकही आपल्या पोटात जात आहेत जे आपल्या जिवाला धोका निर्माण करू शकतात,

प्लास्टिक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे, हे आपल्याला माहिती आहे. पण तरीही बहुतांश घरांमध्ये चहा गाळण्यासाठी प्लास्टिकची गाळणीच वापरली जाते. जेव्हा आपण गरमागरम चहा प्लास्टिकच्या गाळणीमध्ये ओततो तेव्हा उकळत्या चहाच्या उष्णतेमुळे गाळणीच्या प्लास्टिकचे काही सुक्ष्म कण नक्कीच वितळतात आणि ते आपल्या पोटात जात असतात. मग तुम्ही कितीही चांगल्या क्वालिटीची चहाची गाळणी वापरली तरी हे असं होतंच, त्यामुळे चहा गाळण्यासाठी प्लास्टिकच्या गाळणीचा वापर करणं कटाक्षाने टाळावं.

कारण हळूहळू सुक्ष्म कणांच्या रुपात आपल्या शरीरात जाणारं प्लास्टिक आपल्या रक्तामध्ये, आतड्यांमध्ये साचायला सुरुवात होते आणि त्यातूनच मग अनेक कठीण आजारांना आमंत्रण मिळतं. त्यामुळे अगदी थोडक्या पैशांकडे बघू नका. स्टीलच्या गाळणीपेक्षा प्लास्टिकची गाळणी ५० ते ६० रुपयांनी नक्कीच स्वस्त आहे. पण त्या ५०- ६० रुपयांपेक्षा तुमचे शरीर जास्त अनमोल आहे. त्यामुळे आपल्या घरात तात्काळ हा बदल करा. काही लोकांचा ऑफिसमध्ये खूप जास्त चहा पिणं होतं. हा चहा नेमका कोणत्या गाळणीतून गाळला जात आहे, याकडेही लक्ष द्यायला हवं. शक्य असल्यास त्यातही बदल करायला हवा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

3 मिनिटे ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

7 मिनिटे ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

22 मिनिटे ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

22 तास ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

22 तास ago

एपस्टीन फाइल्समुळेच महिला विधेयक? गाडगीळ यांचा संशय

मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…

22 तास ago