आरोग्य

शुगर सतत कमी जास्त होते कारण हमखास होणाऱ्या ५ चुका, वेळीच बदला कारण…

डायबिटिज हा आजार सध्या अनेकांना होताना दिसून येत आहे. डायबिटिज होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली व वेळेवर अन्नाचे सेवन न करणे हे आहे. अधिकतर लोकं फास्ट फूड, जंक फूड, पॅक्ड फूड या पदार्थांच्या आहारी जात आहे. जे आरोग्यासाठी घातक ठरत आहे. ज्यामुळे अनेकांना ब्लड प्रेशर, डायबिटिज, हृदयाच्या संबंधित आजार, अशा प्रकारचे आजार उद्भवत आहे. काही लोकांच्या ब्लड शुगरमध्ये चढ – उतार होत असते. डायबिटिज रुग्णांना रोजची औषधं घ्यावे लागतात. तरी देखील त्यांच्या शुगर लेवलमध्ये का बदल घडते?

यासंदर्भात, न्यूज १८ या वेबसाईटला माहिती देताना मधुमेह तज्ज्ञ आणि सल्लागार एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. पारस अग्रवाल सांगतात, ”मधुमेहाच्या रुग्णांमध्ये औषधे घेतल्यानंतरही रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होते. त्यांच्या ब्लड शुगरमध्ये खूप चढ-उतार होत असेल तर, त्यामागे अनेक कारणे असू शकतात”

औषधाच्या वेळेत चुका…

डॉक्टरांच्या मते, ”अनेक वेळा मधुमेहाचे रुग्ण योग्य वेळी औषधे घेत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ – उतार होते. काही लोकं जेवणापूर्वी दिलेली औषधे जेवणानंतर घेतात, तर काही लोकं जेवणानंतरची औषधे जेवणापूर्वी घेतात. या कारणांमुळे रक्तातील साखरेच्या पातळी वाढ होते.”

दैनंदिन दिनचर्यामध्ये बदल…

रुग्ण जेव्हा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत अचानक बदल करतात, तेव्हा रक्तातील साखरेच्या पातळीत देखील झपाट्याने बदल होते. उदाहरणार्थ, एक दिवस खूप व्यायाम करणे, दुसऱ्या दिवशी व्यायाम न करणे. कधी खूप जास्त खाणे, तर कधी कमी खाणे. या कारणांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ – उतार होते.

ताणतणाव…

स्ट्रेसमुळे अनेकदा आरोग्यात देखील बदल घडते. आपण कितीही वेळेवर औषधे घेतली किंवा लाईफस्टाईलला फॉलो केलं, जर आपण जास्त ताण घेत असाल, तर रक्तातील साखरेच्या पातळीत सतत चढ-उतार होणार.

इतर आजार…

काही आजारांच्या स्थितीत रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होते. उदाहरणार्थ, पोट खराब, ताप, किंवा इतर काही आजार असतील तर रक्तातील साखरेची पातळी वर-खाली होणे स्वाभाविक आहे.

कमी झोप…

मधुमेहाच्या रुग्णांनी कमी झोप घेतली तरी, देखील रक्तातील साखर खूप वेगाने वाढते.

कंट्रोल करण्यासाठी टिप्स…

अशा परिस्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टरांकडून आपले दिनचर्य प्लॅन तयार करून घ्या. यासोबतच योग्य वेळी खा, योग्य वेळी व्यायाम करा, योग्य वेळी नाश्ता करा. यासह सांगितलेली औषधे वेळेवर घ्या. नियमित व्यायाम, योग, ध्यान यांचा आधार घ्या. मोबाईलवर कमी वेळ घालवा, व पुरेशी झोप घ्या.

(शोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

5 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

5 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

5 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

5 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

10 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

11 तास ago