आरोग्य

शुगर सतत कमी जास्त होते कारण हमखास होणाऱ्या ५ चुका, वेळीच बदला कारण…

डायबिटिज हा आजार सध्या अनेकांना होताना दिसून येत आहे. डायबिटिज होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली व वेळेवर अन्नाचे सेवन न करणे हे आहे. अधिकतर लोकं फास्ट फूड, जंक फूड, पॅक्ड फूड या पदार्थांच्या आहारी जात आहे. जे आरोग्यासाठी घातक ठरत आहे. ज्यामुळे अनेकांना ब्लड प्रेशर, डायबिटिज, हृदयाच्या संबंधित आजार, अशा प्रकारचे आजार उद्भवत आहे. काही लोकांच्या ब्लड शुगरमध्ये चढ – उतार होत असते. डायबिटिज रुग्णांना रोजची औषधं घ्यावे लागतात. तरी देखील त्यांच्या शुगर लेवलमध्ये का बदल घडते?

यासंदर्भात, न्यूज १८ या वेबसाईटला माहिती देताना मधुमेह तज्ज्ञ आणि सल्लागार एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. पारस अग्रवाल सांगतात, ”मधुमेहाच्या रुग्णांमध्ये औषधे घेतल्यानंतरही रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होते. त्यांच्या ब्लड शुगरमध्ये खूप चढ-उतार होत असेल तर, त्यामागे अनेक कारणे असू शकतात”

औषधाच्या वेळेत चुका…

डॉक्टरांच्या मते, ”अनेक वेळा मधुमेहाचे रुग्ण योग्य वेळी औषधे घेत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ – उतार होते. काही लोकं जेवणापूर्वी दिलेली औषधे जेवणानंतर घेतात, तर काही लोकं जेवणानंतरची औषधे जेवणापूर्वी घेतात. या कारणांमुळे रक्तातील साखरेच्या पातळी वाढ होते.”

दैनंदिन दिनचर्यामध्ये बदल…

रुग्ण जेव्हा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत अचानक बदल करतात, तेव्हा रक्तातील साखरेच्या पातळीत देखील झपाट्याने बदल होते. उदाहरणार्थ, एक दिवस खूप व्यायाम करणे, दुसऱ्या दिवशी व्यायाम न करणे. कधी खूप जास्त खाणे, तर कधी कमी खाणे. या कारणांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ – उतार होते.

ताणतणाव…

स्ट्रेसमुळे अनेकदा आरोग्यात देखील बदल घडते. आपण कितीही वेळेवर औषधे घेतली किंवा लाईफस्टाईलला फॉलो केलं, जर आपण जास्त ताण घेत असाल, तर रक्तातील साखरेच्या पातळीत सतत चढ-उतार होणार.

इतर आजार…

काही आजारांच्या स्थितीत रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होते. उदाहरणार्थ, पोट खराब, ताप, किंवा इतर काही आजार असतील तर रक्तातील साखरेची पातळी वर-खाली होणे स्वाभाविक आहे.

कमी झोप…

मधुमेहाच्या रुग्णांनी कमी झोप घेतली तरी, देखील रक्तातील साखर खूप वेगाने वाढते.

कंट्रोल करण्यासाठी टिप्स…

अशा परिस्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टरांकडून आपले दिनचर्य प्लॅन तयार करून घ्या. यासोबतच योग्य वेळी खा, योग्य वेळी व्यायाम करा, योग्य वेळी नाश्ता करा. यासह सांगितलेली औषधे वेळेवर घ्या. नियमित व्यायाम, योग, ध्यान यांचा आधार घ्या. मोबाईलवर कमी वेळ घालवा, व पुरेशी झोप घ्या.

(शोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

20 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

20 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

1 दिवस ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

2 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

2 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago