आरोग्य

शुगर सतत कमी जास्त होते कारण हमखास होणाऱ्या ५ चुका, वेळीच बदला कारण…

डायबिटिज हा आजार सध्या अनेकांना होताना दिसून येत आहे. डायबिटिज होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यात मुख्य कारण म्हणजे खराब जीवनशैली व वेळेवर अन्नाचे सेवन न करणे हे आहे. अधिकतर लोकं फास्ट फूड, जंक फूड, पॅक्ड फूड या पदार्थांच्या आहारी जात आहे. जे आरोग्यासाठी घातक ठरत आहे. ज्यामुळे अनेकांना ब्लड प्रेशर, डायबिटिज, हृदयाच्या संबंधित आजार, अशा प्रकारचे आजार उद्भवत आहे. काही लोकांच्या ब्लड शुगरमध्ये चढ – उतार होत असते. डायबिटिज रुग्णांना रोजची औषधं घ्यावे लागतात. तरी देखील त्यांच्या शुगर लेवलमध्ये का बदल घडते?

यासंदर्भात, न्यूज १८ या वेबसाईटला माहिती देताना मधुमेह तज्ज्ञ आणि सल्लागार एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ. पारस अग्रवाल सांगतात, ”मधुमेहाच्या रुग्णांमध्ये औषधे घेतल्यानंतरही रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होते. त्यांच्या ब्लड शुगरमध्ये खूप चढ-उतार होत असेल तर, त्यामागे अनेक कारणे असू शकतात”

औषधाच्या वेळेत चुका…

डॉक्टरांच्या मते, ”अनेक वेळा मधुमेहाचे रुग्ण योग्य वेळी औषधे घेत नाहीत. त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ – उतार होते. काही लोकं जेवणापूर्वी दिलेली औषधे जेवणानंतर घेतात, तर काही लोकं जेवणानंतरची औषधे जेवणापूर्वी घेतात. या कारणांमुळे रक्तातील साखरेच्या पातळी वाढ होते.”

दैनंदिन दिनचर्यामध्ये बदल…

रुग्ण जेव्हा त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत अचानक बदल करतात, तेव्हा रक्तातील साखरेच्या पातळीत देखील झपाट्याने बदल होते. उदाहरणार्थ, एक दिवस खूप व्यायाम करणे, दुसऱ्या दिवशी व्यायाम न करणे. कधी खूप जास्त खाणे, तर कधी कमी खाणे. या कारणांमुळे रक्तातील साखरेच्या पातळीत चढ – उतार होते.

ताणतणाव…

स्ट्रेसमुळे अनेकदा आरोग्यात देखील बदल घडते. आपण कितीही वेळेवर औषधे घेतली किंवा लाईफस्टाईलला फॉलो केलं, जर आपण जास्त ताण घेत असाल, तर रक्तातील साखरेच्या पातळीत सतत चढ-उतार होणार.

इतर आजार…

काही आजारांच्या स्थितीत रक्तातील साखरेच्या पातळीत बदल होते. उदाहरणार्थ, पोट खराब, ताप, किंवा इतर काही आजार असतील तर रक्तातील साखरेची पातळी वर-खाली होणे स्वाभाविक आहे.

कमी झोप…

मधुमेहाच्या रुग्णांनी कमी झोप घेतली तरी, देखील रक्तातील साखर खूप वेगाने वाढते.

कंट्रोल करण्यासाठी टिप्स…

अशा परिस्थितीत डॉक्टरांशी संपर्क साधा. डॉक्टरांकडून आपले दिनचर्य प्लॅन तयार करून घ्या. यासोबतच योग्य वेळी खा, योग्य वेळी व्यायाम करा, योग्य वेळी नाश्ता करा. यासह सांगितलेली औषधे वेळेवर घ्या. नियमित व्यायाम, योग, ध्यान यांचा आधार घ्या. मोबाईलवर कमी वेळ घालवा, व पुरेशी झोप घ्या.

(शोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

8 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

10 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

10 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

13 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

13 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

17 तास ago