अनेक प्रकारचे तेल आहेत ज्याचा उपयोग त्वचा आणि केसांसाठी तसेच आरोग्यासाठी केला जातो. पण, एक विशिष्ठ प्रकारचे तेल आहे जे तूमच्या प्रत्येक समस्येवर फायदेशीर ठरू शकते. त्या तेलाचे नाव आहे निलगिरी तेल.
निलगिरीच्या तेलामध्ये जिवाणूरोधक, कवक रोधक आणि रोग प्रतिबंधक तसेच अँटिव्हायरस, सुज, अंगदुखी आणि सर्दी खोकला यावर उपयुक्त ठरणारे गुण आहेत. जे की अशा समस्यांवर इलाज करणाऱ्या औषधांसाठी चांगले घटक मानले जातात.
याच तेलाचे काही आश्चर्यचकीत करणारे फायदे जाणून घेऊयात.
हिवाळ्यातील समस्यांसाठी निलगिरीचे तेल लाभदायक आहे. हे तेल सर्दी, पडसं, खोकला, नाक वाहत राहणे, गळ्यामध्ये होणारी खिचखिच, अस्थमा, ब्रोंकाइटिस आणि साईंसायटीसच्या इलाजासाठी मदत करते.
प्रवास झाल्याने किंवा जास्त चालल्याने पाय खूप सुजतात. अशावेळी झोपण्यापूर्वी पायाच्या तळव्यावर नीलगिरीच्या तेलाचा मसाज करावा.याने सुज कमी येते आणि दुखणेही कमी होते.
ज्यांना झोप येत नाही, ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी निलगिरी तेल एखाद्या चमत्कारासारखेच आहे. कारण, तेल लावताच तूम्हाला शांत व गाढ झोप लागते.
पायाच्या दुखण्यावर आता गोळी खाण्याची गरज नाही. पाय आणि गुडघे पाठदुखीवर निलगिरी तेल फायद्याचे ठरते. डोळ्यांची नजर कमजोर झाली असेल तर त्यावरही हे तेल कमालीचे गुणकारी ठरत आहे.
जर नीलगिरीचे तेल छातीवर लावले, तर ते जडपणाची समस्या दूर करते. यामुळे शरीराला ऑक्सिजन अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकेल. त्याच्या अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे ते फुफ्फुसातील जळजळ आणि संसर्ग दूर करण्यासाठी देखील मदत करते.
डोकेदुखी, थकवा किंवा तणाव झाल्यास त्या तेलाचे दोन थेंब कपाळावर लावा आणि हलक्या हातांनी पसरवा. यानंतर, काही काळ झोपा. भरपूर विश्रांती घ्या. अरोमा थेरपीमध्ये देखील हे तेल वापरले जाते.
(सोशल मीडियावरून साभार)
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…
महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…