लिव्हर सिस्ट हे पिशव्याच्या स्वरूपात गाठी असतात. जे द्रव किंवा घन पेशींनी भरलेले असतात. लिव्हरच्या गाठीची बहुतेक प्रकरणे जन्मापासूनच असतात. यामध्ये कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. तथापि, काही वेळा गाठी मोठ्या झाल्यास, वेदना किंवा इतर लक्षणे जाणवू शकतात. ज्यासाठी वेळेवर उपचार आवश्यक आहेत. तर जाणून घेऊया, लिव्हर मध्ये गाठी बनल्यावर किंवा वाढल्यावर दिसणाऱ्या लक्षणांबद्दल माहिती.
पोट फुगणे किंवा बाहेर येणे: लिव्हर मध्ये लिव्हर सिस्ट किंवा गाठ निर्माण झाल्यास, रुग्णांचे पोट फुगायला लागते. ज्यामध्ये पोट आतून बाहेर पडल्या सारखे वाटते. जर तुम्हाला अशी चिन्हे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या, जेणेकरून उपचार वेळेवर सुरू होईल.
पोटात जडपणा किंवा सूज येणे: लिव्हर मध्ये गाठ झाल्यास पोटात जडपणा किंवा सूज जाणवते. जर अशा लक्षणांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले तर स्थिती गंभीर होऊ शकते.
पोटदुखी: जेव्हा लिव्हर मध्ये गाठी वाढतात तेव्हा पोटात तीव्र वेदना होतात. ज्यामुळे परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. जर तुम्हाला अशी लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
छातीत जळजळ: आहार किंवा जीवनशैलीतील बदलामुळे छातीत जळजळ होण्याची समस्या अनेकदा उद्भवते. त्यामुळे अशी लक्षणे गंभीर स्थितीत दिसल्यास लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. जर लिव्हर मध्ये गाठी निर्माण झाल्या असतील तरी छातीत जळजळ होऊ शकते.
मळमळ आणि उलट्या: जास्त मळमळ आणि उलट्या लिव्हरचे नुकसान सूचित करतात. अशी लक्षणे कधीकधी गंभीर परिस्थितीतही दिसू शकतात. त्याच वेळी, काही जणांना खांद्यामध्ये वेदना देखील जाणवू शकतात. जेव्हा लिव्हर मध्ये गाठ तयार होते, तेव्हा शरीर अनेक सिग्नल देते, ज्याकडे लक्ष देऊन आपण उपचार सुरू करू शकतो. लिव्हर मध्ये गाठ होण्याची अनेक सामान्य लक्षणे असू शकतात.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सरदवाडी गावाजवळ भरधाव पेट्रोल-डिझेल टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने…
शिरुर (तेजस फडके): वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा होत…
शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा…
आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…
लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…
एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…