आरोग्य

आपला संतूलित आहार कसा असावा

चांगला आहार हाच प्रमूख चांगल्या आरोग्याचा स्रोत आहे. मग त्या अन्नात अश्या गोष्टी असायला पाहिजे कि, ज्याने ते जेवण रूचकर व चवदार सोबत पौष्टिक, बलदायी, आरोग्यदायी असले पाहिजे. तेव्हा आपले महाराष्ट्रियन जेवण या अनुषंगाने अतिशय उत्तम स्रोत आहे. आपल्याला जेवणातून, पिष्टमय पदार्थ, प्रोटिन्स, स्निग्ध पदार्थ (वसा, फँटस् तूप, तेल, मेद) विटामिन्स, आणि क्षार मिळायला हवेत आणि आयुर्वेद म्हणते कि, जेवणांत गोड, आंबट, तिखट, खारट, कडू, तुरट, असे षड्रस मिळायला हवेत, तर ते परिपूर्ण जेवण असतं.

आपले मराठी जेवण शास्रशुद्ध असते. वरणातील डाळ प्रोटिन्स ची पूर्तता करते. यात घातलेला गूळ लोह देतो. तर, चिंचेचा कोळ लोह पचवायला मदत करतो. भात, पोळी, भाकरी, यांतून पिष्टमय पदार्थ मिळतात. त्यातून शरिराला उर्जा मिळते. वरणभातावर पडणारी साजूक तूपाची धार, स्निग्धता, देउन आतडे नरम ठेवते आणि अन्न पचवण्यास मदत करते. वेगवेगळ्या भाज्यांमधून मिळणारे मिनरल्स, आणि खनिजे पोषक ठरतात. थाळितले डावीकडचे पदार्थ मीठ, लिंबाची फोड, पंचाम्रूत, मिरचिचा ठेचा, थोडी कोशिंबिर, हे सर्व तोंडाला रस सुटून जेवण पचवतात.

लिंबू bit-C ची पूर्ति करते, तर हिरवी मिरची प्रतिकारशक्ती वाढवते, जंतूनाशक म्हणून. तीळ, शेंगदाणे, खोबरे, वंगण म्हणून उपयोगी ठरते, आणि स्निग्धता देते. अधे मध्ये जिभेला जिवंत करायला या डाव्या बाजूला असणाऱ्या पदार्थाचा उपयोग ठरतो. मिठ मात्र चवीचे खायचे. मसाले भातातले काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे शरिराला उर्जा देतात; तर मसाले सर्दी, कफ, विकारांवर अंकूश ठेवतात. पापडातला उडिद बळ देतो, ताकद, देतो. वाटितला मठ्ठा, ताक हे मन प्रसन्न करून मानसिक ताण कमी करते.

पातळ भाजीतले शेंगदाणे, खोबरे व फोडणीतला हिंग, अन्नाचे पचन करण्यास मदत करतो. सोबत मेतकूट म्हणजे अनेक डाळिंचा संगम, ज्यामुळे प्रोटिन मिळून ताकद वाढते. आणि सर्वात शेवटी गोड म्हणून शिरा, श्रीखंड, आमरस हे तृप्ती देउन, मानसिक ताण, कमी करते. मग मात्र हे आकंठ, जेवण पचावे म्हणून व त्यासाठी कॅल्शियम सहित अनेक द्रव्ये उपलब्ध व्हावित म्हणून (कात, चूना, सुपारी, लवंग, वेलची, खोबरे, गुलकंद) असे अनेक पदार्थ घातलेला त्रयोदशगुणी विडा हा खायला हवाच.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…

7 तास ago

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…

7 तास ago

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…

8 तास ago

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…

9 तास ago

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

1 दिवस ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

1 दिवस ago