आरोग्य

आपला संतूलित आहार कसा असावा

चांगला आहार हाच प्रमूख चांगल्या आरोग्याचा स्रोत आहे. मग त्या अन्नात अश्या गोष्टी असायला पाहिजे कि, ज्याने ते जेवण रूचकर व चवदार सोबत पौष्टिक, बलदायी, आरोग्यदायी असले पाहिजे. तेव्हा आपले महाराष्ट्रियन जेवण या अनुषंगाने अतिशय उत्तम स्रोत आहे. आपल्याला जेवणातून, पिष्टमय पदार्थ, प्रोटिन्स, स्निग्ध पदार्थ (वसा, फँटस् तूप, तेल, मेद) विटामिन्स, आणि क्षार मिळायला हवेत आणि आयुर्वेद म्हणते कि, जेवणांत गोड, आंबट, तिखट, खारट, कडू, तुरट, असे षड्रस मिळायला हवेत, तर ते परिपूर्ण जेवण असतं.

आपले मराठी जेवण शास्रशुद्ध असते. वरणातील डाळ प्रोटिन्स ची पूर्तता करते. यात घातलेला गूळ लोह देतो. तर, चिंचेचा कोळ लोह पचवायला मदत करतो. भात, पोळी, भाकरी, यांतून पिष्टमय पदार्थ मिळतात. त्यातून शरिराला उर्जा मिळते. वरणभातावर पडणारी साजूक तूपाची धार, स्निग्धता, देउन आतडे नरम ठेवते आणि अन्न पचवण्यास मदत करते. वेगवेगळ्या भाज्यांमधून मिळणारे मिनरल्स, आणि खनिजे पोषक ठरतात. थाळितले डावीकडचे पदार्थ मीठ, लिंबाची फोड, पंचाम्रूत, मिरचिचा ठेचा, थोडी कोशिंबिर, हे सर्व तोंडाला रस सुटून जेवण पचवतात.

लिंबू bit-C ची पूर्ति करते, तर हिरवी मिरची प्रतिकारशक्ती वाढवते, जंतूनाशक म्हणून. तीळ, शेंगदाणे, खोबरे, वंगण म्हणून उपयोगी ठरते, आणि स्निग्धता देते. अधे मध्ये जिभेला जिवंत करायला या डाव्या बाजूला असणाऱ्या पदार्थाचा उपयोग ठरतो. मिठ मात्र चवीचे खायचे. मसाले भातातले काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे शरिराला उर्जा देतात; तर मसाले सर्दी, कफ, विकारांवर अंकूश ठेवतात. पापडातला उडिद बळ देतो, ताकद, देतो. वाटितला मठ्ठा, ताक हे मन प्रसन्न करून मानसिक ताण कमी करते.

पातळ भाजीतले शेंगदाणे, खोबरे व फोडणीतला हिंग, अन्नाचे पचन करण्यास मदत करतो. सोबत मेतकूट म्हणजे अनेक डाळिंचा संगम, ज्यामुळे प्रोटिन मिळून ताकद वाढते. आणि सर्वात शेवटी गोड म्हणून शिरा, श्रीखंड, आमरस हे तृप्ती देउन, मानसिक ताण, कमी करते. मग मात्र हे आकंठ, जेवण पचावे म्हणून व त्यासाठी कॅल्शियम सहित अनेक द्रव्ये उपलब्ध व्हावित म्हणून (कात, चूना, सुपारी, लवंग, वेलची, खोबरे, गुलकंद) असे अनेक पदार्थ घातलेला त्रयोदशगुणी विडा हा खायला हवाच.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बहिणीच्या डोळ्यांसमोर भावाची पंचगंगेत उडी; रक्षाबंधनाची राखी हातातच

कोल्हापूर: घरगुती वादातून रागाच्या भरात घराबाहेर पडलेल्या ३२ वर्षीय तरुणाने बहिणीच्या डोळ्यांसमोर रुई येथील पंचगंगा…

1 तास ago

‘कुणाचाही हक्क न काढता मराठा समाजाला न्याय देणार’; शिंदेंचा निर्धार, परभणीत उबाठाला मोठा धक्का

परभणी: मराठा समाजाला न्याय देतानाच ओबीसी, बहुजन, आदिवासी आणि इतर सर्व समाजघटकांच्या हक्कांचे संरक्षण करून सर्वसमावेशक…

1 तास ago

खासगी विद्यापीठांच्या शुल्कावर नियंत्रण आणा; अन्यथा रस्त्यावर उतरू!

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ॲड. अमोल मातेले यांचा सरकारला इशारा; ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत जोरदार…

1 तास ago

शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा…

18 तास ago

डीसीसी निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार? सुभाष देशमुखांचा ठराव; शहाजी पवारही मैदानात

सोलापूर: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून…

18 तास ago

भावाची प्रकृती पाहण्यासाठी गेले; भेट ठरली अखेरची! एकाच दिवशी सख्ख्या भावांचा मृत्यू

निलंगा : भावाची प्रकृती खालावल्याचे समजताच त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाची ती भेटच दोघांची…

18 तास ago