आरोग्य

आला पावसाळा आरोग्य सांभाळा

वर्षा ऋतू: दिनचर्या व घ्यावयाची काळजी

उन्हाळा संपून पावसाळ्याची सुरुवात हा काळ याला “ऋतुसंधी” असे शास्त्रात संबोधन आहे.संपत आलेल्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस व पुढे येणाऱ्या ऋतूचे पहिले 7 दिवस असा 14 दिवसांचा ऋतुसंधी होतो. या संधिकाळात संपणाऱ्या ऋतूची चर्या, आहार,विहार यांचा हळूहळू त्याग करावा व पुढे येणाऱ्या ऋतूला अनुकूल तो सर्व विधी हळूहळू सुरू करावा.

आहार: पावसाळ्यात पचनशक्ती कमी असल्याने ताजा,गरम,पचायला हलके असा आहार घ्यावा.दूधाचे आटवलेले पदार्थ (पनीर,दही, खाव्याचे पदार्थ इ) तळलेले व अंडी नॉनव्हेज चे पचायला जड पदार्थ टाळावेत. विविध गरम सूप,हलके काढे,ताजे गरम अन्न यांचा आहारात समावेश करावा.

unique international school

विहार: गरम कपडे, कानटोपी, यांचा वापर करावा.घर व रूम गरम ठेवावी.रूम हिटर, शेगडी यांचा वापर करावा.पावसात भिजणे टाळावे.भिजल्यास विशेषतः लहान मुलांना लगेच अंग कोरडे करून कपाळ नाक छातीला कोरडी सुंठ वेखंड पावडर चोळावी. गरम फडक्याने तव्यावर शेकावे.

पंचकर्म व उपक्रम: वर्षा ऋतूत वाढलेल्या वात दोषाचे शमन करण्यासाठी बस्ती हा पंचकर्म उपचार करून घ्यावा. स्नेहन (अंगाला तेल लावणे विशेषतः तीळतैल) स्वेदन (दशमूल आदी औषधी द्रव्यांची वाफ घेणे) उटणे लावणे,गरम पाण्याने स्नान, घरात धूप लावणे, गरम व उबदार वस्त्र घालावीत.

दिवसा झोपणे, अति व्यायाम ,मैथुन कर्म, जास्त प्रमाणात खाणे या गोष्टी वर्ज्य कराव्यात.पाणी दूषित असल्याने उकळून थंड करून किंवा कोमट वापरावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

6 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

1 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

7 दिवस ago