आरोग्य

आला पावसाळा आरोग्य सांभाळा

वर्षा ऋतू: दिनचर्या व घ्यावयाची काळजी

उन्हाळा संपून पावसाळ्याची सुरुवात हा काळ याला “ऋतुसंधी” असे शास्त्रात संबोधन आहे.संपत आलेल्या ऋतूचे शेवटचे 7 दिवस व पुढे येणाऱ्या ऋतूचे पहिले 7 दिवस असा 14 दिवसांचा ऋतुसंधी होतो. या संधिकाळात संपणाऱ्या ऋतूची चर्या, आहार,विहार यांचा हळूहळू त्याग करावा व पुढे येणाऱ्या ऋतूला अनुकूल तो सर्व विधी हळूहळू सुरू करावा.

आहार: पावसाळ्यात पचनशक्ती कमी असल्याने ताजा,गरम,पचायला हलके असा आहार घ्यावा.दूधाचे आटवलेले पदार्थ (पनीर,दही, खाव्याचे पदार्थ इ) तळलेले व अंडी नॉनव्हेज चे पचायला जड पदार्थ टाळावेत. विविध गरम सूप,हलके काढे,ताजे गरम अन्न यांचा आहारात समावेश करावा.

unique international school

विहार: गरम कपडे, कानटोपी, यांचा वापर करावा.घर व रूम गरम ठेवावी.रूम हिटर, शेगडी यांचा वापर करावा.पावसात भिजणे टाळावे.भिजल्यास विशेषतः लहान मुलांना लगेच अंग कोरडे करून कपाळ नाक छातीला कोरडी सुंठ वेखंड पावडर चोळावी. गरम फडक्याने तव्यावर शेकावे.

पंचकर्म व उपक्रम: वर्षा ऋतूत वाढलेल्या वात दोषाचे शमन करण्यासाठी बस्ती हा पंचकर्म उपचार करून घ्यावा. स्नेहन (अंगाला तेल लावणे विशेषतः तीळतैल) स्वेदन (दशमूल आदी औषधी द्रव्यांची वाफ घेणे) उटणे लावणे,गरम पाण्याने स्नान, घरात धूप लावणे, गरम व उबदार वस्त्र घालावीत.

दिवसा झोपणे, अति व्यायाम ,मैथुन कर्म, जास्त प्रमाणात खाणे या गोष्टी वर्ज्य कराव्यात.पाणी दूषित असल्याने उकळून थंड करून किंवा कोमट वापरावे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

8 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

8 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

8 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

10 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

21 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

21 तास ago