आरोग्य

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे दूषित होतं. त्यामुळे पावसाळ्यात डायरिया (diarrhoea) किंवा कॉलरा (cholera) होण्याचा धोका वाडतो. अशात वेळीच काही गोष्टींची काळजी घेतली तर डॉक्टरांकडे जाण्याची आणि पैसे खर्च करण्याची वेळ येणार नाही. डायरिया आणि कॉलरासारख्या आजाराच्या मुख्य कारणात अस्वच्छता असतं. त्यामुळे या दिवसात स्वच्छतेवर अधिक भर द्यावा लागतो.

हात चांगले स्वच्छ ठेवा

डायरिया किंवा इतरही आजारांपासून बचाव करण्यासाठी सगळ्यात गरजेचं आहे ते हात चांगले धुणं. यासाठी जेवणाआधी हात साबणानं आणि पाण्यानं कमीत कमी २० सेकंद धुवावे. हात धुतल्यानं डायरियासाठी जबाबदार कीटाणू मरतात आणि तुम्ही सुरक्षित राहता.

स्वच्छ पाणी प्या

पावसाळ्यात डायरिया आणि जुलाब होण्याच्या मुख्य कारणात पाणी असतं. दूषित पाणी तुम्हाला काही दिवसांसाठी आजारी पाडू शकतं. त्यामुळे पाणी स्वच्छ प्या. शक्य झाल्यास पाणी उकडून आणि थंड करून प्या.

फळं आणि भाज्या चांगल्या स्वच्छ करा

या दिवसांमध्ये घरात आणलेली फळं आणि भाज्या धुण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करा. कापलेली फळं आणि भाज्या जास्त वेळ उघड्यावर ठेवू नका.

ताजं जेवण करा

पावसाळ्यात पोटासंबंधी समस्या खूप जास्त होतात. त्यामुळे ताजं आणि गरम अन्न खा. अन्न उघड्यावर ठेवू नका. भांडी स्वच्छ ठेवा.

बाहेरचं खाणं टाळा

हॉटेल, ठेले किंवा स्टॉलवर या दिवसात स्वच्छतेची पुरेशी काळजी घेतली जात नाही. माशा आणि डास भरपूर वाढतात. अशात बाहेरचं खाऊन तुम्हाला डायरियाचा धोका होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या…

2 तास ago

गुडघेदुखीचा त्रास सतावतो? घरीच करा ‘हे’ खास तेल

गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध…

2 तास ago

मोठी स्वप्ने पाहा, जिद्द आणि मेहनतीने यश मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

ठाणे: ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव…

2 तास ago

विठ्ठल मंदिरातील भाविकांच्या सुविधा आणि नागरिकांच्या हक्कांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार; नीलम गोऱ्हे

पंढरपूर: शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी…

2 तास ago

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसची ‘ReelSeRealTalk’ रील स्पर्धा

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष…

2 तास ago

महाराष्ट्राची शेती! संकट, वास्तव आणि भविष्यातील दिशा

मुंबई: महाराष्ट्र हा संत, समाजसुधारक आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा प्रदेश आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आजही शेतीच…

3 तास ago