आरोग्य

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या आहारामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात. पोटाचे आरोग्य बिघडून अपचनाचा त्रासही होतो.

पावसाळ्यात आपल्याला उघड्यावरचे अन्न खाण्यास मनाई केली जाते. या ऋतूमध्ये माश्या आणि डासांची संख्या अधिक प्रमाणात वाढते. परंतु अनेकदा आपण घरातही असे अनेक अन्नपदार्थ खातो. ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात बाजारात अनेक रानभाज्यांची चव चाखायला मिळते. परंतु या काळात अशा अनेक भाज्या आहेत ज्या खाऊ नये.यामुळे आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. पाहूया कोणत्या भाज्या खाऊ नये.

1) पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाऊ नका. यामध्ये पालक, मेथी, फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाणे टाळा. या ऋतूमध्ये चिखल, कीटक आणि ओलावा असतो. ज्यामुळे भाज्या लवकर संक्रमित होतात.आपण या भाज्या कितीही स्वच्छ पाण्याने धुतल्या तरी आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक जास्त असते.

2) मशरुम हे शरीरासाठी पौष्टिक असले तरी पावसाळ्यात खाऊ नका. याचे सेवन करणे धोकादायक ठरु शकते. पावसाळ्यात भरपूर ओलावा असतो. ज्यामुळे मशरुम खूप लवकर खराब होतात आणि कुजतात. यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. पावसाळ्यात मशरुम खूप काळजीपूर्वक खा.

3) ब्रोकोली या क्रूसिफेरस या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असल्या तरी पावसाळ्यात खाणे टाळायला हवे. यामुळे आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यात ओलावा आणि कीटक सहजपणे यामध्ये अडकतात. या कीटकांना स्वच्छ करणे कठीण होते. या भाज्या योग्यपद्धतीने शिजवल्या नाहीतर पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.

4) पावसाळ्यात वांगी खाणे टाळायला हवा. ही भाजी चविष्ट आणि पौष्टिकतेने समृद्ध असते. पावसाळ्यात ही भाज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. पावसाळ्यात ओलावा आणि मातीमुळे वांग्यांमध्ये लवकर किड लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यात डायरियाचा वाढतो धोका, आधीच ‘या’ टिप्स फॉलो कराल तर बिघडणार नाही तब्येत

पावसाच्या दिवसांमध्ये पाण्यामुळे पसरणाऱ्या आजारांचा धोका अधिक वाढतो. कारण या दिवसात पाणी आणि अन्न सहजपणे…

2 तास ago

गुडघेदुखीचा त्रास सतावतो? घरीच करा ‘हे’ खास तेल

गुडघेदुखीचा त्रास हा फारच कॉमन पण तितकाच त्रासदायक देखील ठरतो. गुडघेदुखीची समस्या ही विशेषतः वृद्ध…

2 तास ago

मोठी स्वप्ने पाहा, जिद्द आणि मेहनतीने यश मिळवा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

ठाणे: ठाणे महापालिका शाळा क्रमांक २३ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव…

2 तास ago

विठ्ठल मंदिरातील भाविकांच्या सुविधा आणि नागरिकांच्या हक्कांसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार; नीलम गोऱ्हे

पंढरपूर: शिवसेना नेत्या व विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी…

2 तास ago

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसची ‘ReelSeRealTalk’ रील स्पर्धा

मुंबई: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई प्रदेश युवक काँग्रेसतर्फे ‘#ReelSeRealTalk’ या विशेष…

2 तास ago

महाराष्ट्राची शेती! संकट, वास्तव आणि भविष्यातील दिशा

मुंबई: महाराष्ट्र हा संत, समाजसुधारक आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा प्रदेश आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आजही शेतीच…

3 तास ago