आरोग्य

पावसाळ्यातील या ५ भाज्या चुकूनही खाऊ नका

पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात. चुकीच्या आहारामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात. पोटाचे आरोग्य बिघडून अपचनाचा त्रासही होतो.

पावसाळ्यात आपल्याला उघड्यावरचे अन्न खाण्यास मनाई केली जाते. या ऋतूमध्ये माश्या आणि डासांची संख्या अधिक प्रमाणात वाढते. परंतु अनेकदा आपण घरातही असे अनेक अन्नपदार्थ खातो. ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. पावसाळ्यात बाजारात अनेक रानभाज्यांची चव चाखायला मिळते. परंतु या काळात अशा अनेक भाज्या आहेत ज्या खाऊ नये.यामुळे आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. पाहूया कोणत्या भाज्या खाऊ नये.

1) पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाऊ नका. यामध्ये पालक, मेथी, फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाणे टाळा. या ऋतूमध्ये चिखल, कीटक आणि ओलावा असतो. ज्यामुळे भाज्या लवकर संक्रमित होतात.आपण या भाज्या कितीही स्वच्छ पाण्याने धुतल्या तरी आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक जास्त असते.

2) मशरुम हे शरीरासाठी पौष्टिक असले तरी पावसाळ्यात खाऊ नका. याचे सेवन करणे धोकादायक ठरु शकते. पावसाळ्यात भरपूर ओलावा असतो. ज्यामुळे मशरुम खूप लवकर खराब होतात आणि कुजतात. यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. पावसाळ्यात मशरुम खूप काळजीपूर्वक खा.

3) ब्रोकोली या क्रूसिफेरस या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असल्या तरी पावसाळ्यात खाणे टाळायला हवे. यामुळे आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यात ओलावा आणि कीटक सहजपणे यामध्ये अडकतात. या कीटकांना स्वच्छ करणे कठीण होते. या भाज्या योग्यपद्धतीने शिजवल्या नाहीतर पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.

4) पावसाळ्यात वांगी खाणे टाळायला हवा. ही भाजी चविष्ट आणि पौष्टिकतेने समृद्ध असते. पावसाळ्यात ही भाज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. पावसाळ्यात ओलावा आणि मातीमुळे वांग्यांमध्ये लवकर किड लागते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

6 मिनिटे ago

तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक काँग्रेसमध्ये; आरक्षणावरून सरकारवर सपकाळ यांचा घणाघात

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे कॅप्टन अमोल महाडिक यांनी आज आपल्या…

9 मिनिटे ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांचे ‘जागतिक ज्ञानपीठ’ उभारणार

घाटकोपरमध्ये ३०० कोटींच्या संशोधन केंद्राचे भूमिपूजन मुंबई : लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा…

14 मिनिटे ago

१८ वर्षानंतर उंची वाढत नाही हा गैरसमज! मुलांना या ३ गोष्टींची सवय लावा उंची वाढेल…

आपल्यापैकी अनेकजण उंचीवर नाखुश असतात. काहींची ऊंची फार कमी किंवा फार जास्त असते. उंची कमी…

4 तास ago

केसांचे आरोग्य आणि केसगळती

अगोदर माझे केस सुंदर, मऊ, मजबूत, काळेशार आणि घनदाट होते. हार्मोनल बदलांमुळे प्रेग्नेंसीमध्ये आणि बाळाच्या…

4 तास ago

राज्यातील शाळांवर FDAचा कडक फूड सेफ्टी ‘वॉच’; जंक फूडला 50 मीटर परिसरात बंदी

तुकाराम मुंढेंची 'सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र' मोहीम; FSSAI परवाना सक्तीचा, वर्षातून दोनदा…

4 तास ago