आरोग्य

लहान वयात ‘दमा’ होण्याची ‘ही’ आहेत कारणे आणि लक्षणे

दमा हा आजार आता लहान मुलांमध्येही दिसतो. या मुलांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आनुवांशिकता याचे मुख्य कारण समजले जाते. परंतु, या आजाराची विविध कारणे आहेत. योग्य वजन असेल तर लहान मुलांचा दम्यासारख्या आजारापासून बचाव होऊ शकतो. साधारण 23 ते 27 टक्के लहान मुलांमध्ये दम्याचे मुख्य कारण वाढलेले वजन असते. ज्यांचे वजन वाढलेले असते त्यांना हा आजार होण्याचा धोका अधिक असतो.

ही आहेत कारणे
1) काही औषधे सतत घेतल्याने
2) मुलाचे जन्मावेळी कमी असलेले वजन
3)श्वसनमार्गावरील जंतुप्रादुर्भाव
4) तणाव व शारीरिक कष्ट
5) हवामानातील बदल (थंड हवामान) किंवा दमटपण
6) वाढते शहरीकरण
7) घरातील ऍलर्जिक घटक
8) वजन जास्त असण

ही आहेत लक्षणे
1) सतत खोकला येणे.
2) श्वास घेताना किंवा सोडताना आवाज येणे.
3) श्वास कमी घेता येणे.
4) छातीत वेदना होणे.
5) सतत घाबरणे.
6) अस्वस्थता जाणवणे.
7) सतत थकवा जाणवणे.

अशी घ्या काळजी
1) कपडे रोज गरम पाण्याने धुवावेत.
2) लहान मुलांना जनावरांपासून दूर ठेवा.
3) त्यांना वेळेवर औषधे द्यावीत.
4) इन्हेलर नेहमी जवळ ठेवा.
5) रोज हलका व्यायम करावा.
6) धूळ-मातीपासून दूर रहा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

5 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

12 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

12 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

12 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

13 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

13 तास ago