तुरटी म्हणजेच फिटकरी हिचा वापर आपण दाढी झाली की कापलेले असेल किंवा कुठे थोडेफार त्वचा सोलली गेली असेल तर ती बरी होण्यासाठी करतो. पण या व्यतिरिक्त सुध्दा अनेक फायदे तुरटी आपल्याला देते जे तुम्हाला कदाचित माहीत नसतील.
तुरटीचे फायदे
पावसाळ्याच्या मौसमात तुरटी पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरली जाते. तुरटी ही दोन रंगात मिळते लाल आणि सफेद. जास्त प्रमाणात लोक सफेद तुरतीचा वापर करतात.
तुरटीचे फायदे
ज्या लोकांना जास्त घाम येण्याची समस्या आहे त्या लोकांनी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडी तुरटी मिक्स करून अंघोळ केल्यास घाम येणे कमी होते. जर कापले असेल किंवा एखादी जखम झाली असेल आणि त्यामधून रक्त येत असेल तर जी जखम तुरटीच्या पाण्याने धुवावी आणि जखमेवर थोडीशी तुरटीची पावडर टाकावी यामुळे रक्त वाहने (येणे) बंद होईल.
तुरटी आणि काळी मिरी पावडर करून दातांच्या मुळाना घासल्यास दातदुखी कमी होते. सेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर तुरटी लावल्यामुळे चेहरा मुलायम होतो.
अर्धा ग्राम फिटकरी पावडर मधा मध्ये मिक्स करून चाटल्यामुळे दमा आणि खोकल्या मध्ये आराम मिळतो.
दररोज दोन्ही वेळा तुरटी गरम पाण्यात एकत्र करून गुळणी केल्याने दाताचे किडे तसेच तोंडाचा वास दूर होतो.
टॉन्सिल ची समस्या असेल तर गरम पाण्यात चिमुटभर तुरटी आणि मीठ टाकून गुळणी करा. यामुळे टान्सीलच्या समस्ये मध्ये आराम मिळतो.
एक लिटर पाण्यात १० ग्रॅम तुरटी मिसळून त्याने केस दररोज धुतल्यास केसातील उवा मरतात. दहा ग्राम तुरटीच्या चूर्ण मध्ये पाच ग्राम सेंधव मीठ टाकून पावडर बनवा. या पावडरीने दररोज दात घासल्यास दातांच्या दुखण्यात आराम मिळतो.
(सोशल मीडियावरून साभार)
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…