जेवण झाल्यानंतर शतपावली करायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण तरी कधी कंटाळा येतो म्हणून तर कधी वेळ नसतो म्हणून आपण ती करणं टाळतो.
जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. ते नियंत्रित राहण्यास मदत होते.
जेवण केल्यानंतर काही मिनिटे चालल्याने आतड्याचे काम अधिक चांगले होऊन पचनक्रिया उत्तम होते. यामुळे आपोआपच शरीरावर चरबी साचून राहण्याचे प्रमाण घटते.
चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदय निरोगी राहण्यासही मदत होते.
जेवण झाल्यानंतर चालल्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन कमी होण्यास मदत होते तसेच एंडोमॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन हे पॉझिटीव्ह हार्मोन्स वाढतात. त्यामुळे ताण कमी होतो. रिलॅक्स वाटते.
ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनीही जेवण झाल्यानंतर काही मिनिटांसाठी नियमितपणे चालावे. कारण चालल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण कमी होत असल्याने मन, शरीर रिलॅक्स होऊन चांगली झोप लागते.
(सोशल मीडियावरून सभार)
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर आज बुधवार (दि 29) दुपारी सुमारे १२…
शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका व्यक्तीने पुण्याला काम…
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…