जेवण झाल्यानंतर शतपावली करायला पाहिजे हे आपल्याला माहिती आहे. पण तरी कधी कंटाळा येतो म्हणून तर कधी वेळ नसतो म्हणून आपण ती करणं टाळतो.
जेवल्यानंतर चालल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. ते नियंत्रित राहण्यास मदत होते.
जेवण केल्यानंतर काही मिनिटे चालल्याने आतड्याचे काम अधिक चांगले होऊन पचनक्रिया उत्तम होते. यामुळे आपोआपच शरीरावर चरबी साचून राहण्याचे प्रमाण घटते.
चालल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहून हृदय निरोगी राहण्यासही मदत होते.
जेवण झाल्यानंतर चालल्यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन कमी होण्यास मदत होते तसेच एंडोमॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन हे पॉझिटीव्ह हार्मोन्स वाढतात. त्यामुळे ताण कमी होतो. रिलॅक्स वाटते.
ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे त्यांनीही जेवण झाल्यानंतर काही मिनिटांसाठी नियमितपणे चालावे. कारण चालल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण कमी होत असल्याने मन, शरीर रिलॅक्स होऊन चांगली झोप लागते.
(सोशल मीडियावरून सभार)
तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…