एक्सरसाईज करण्याची सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत म्हणजे पायी चालणं मानली जाते. डॉक्टर नेहमीच सकाळी, सायंकाळी जेवण झाल्यावर पायी चालण्याचा सल्ला देतात. याचे शरीराला अनेक फायदे मिळतात जे अनेकांना माहीत नसतात. अशात रोजच्या रूटीनमध्ये रात्री झोपण्याआधी 30 मिनिटे पायी चालल्याने बरेच फायदे होतात.
झोपण्याआधी पायी चालण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची झोप मिळेल. क्यूरियस 2023 मध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, चालल्याने आणि हलकी एक्सरसाईज केल्याने चांगली झोप येण्यास मदत मिळते. पायी चालल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि आपल्याला आराम मिळतो.
वजन कमी करण्यास मदत
रात्री झोपण्याआधी 30 मिनिटे पायी चालल्याने मेटाबॉलिज्म वाढतं आणि झोपे दरम्यानही कॅलरी बर्न होतात. झोपण्या आधी पायी चालल्याने वजन कमी करण्यास किंवा कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. हार्डकोर फिजिकल ॲक्टिविटीने अधिक कॅलरी बर्न होतात. रात्री पुन्हा पुन्हा पायी चालल्याने कॅलरी मॅनेज मेंटमध्येही सुधारणा होते.
मानसिक आरोग्य सुधारत
सांयकाळी चालणं आपल्या मानसिक आणि शरीरिक आरोग्यासाठी चांगलं असतं. एका रिसर्चनुसार, पायी चालल्याने तणाव आणि चिंतेची लक्षणं कमी केली जाऊ शकतात. पायी चालल्याने आपले नकारात्मक विचार दूर होतात आणि आपल्या मेंदुला दिवसभरातील घटना पचवण्यास मदत मिळते.
अन्न पचवण्यास मदत
अनेक लोकांना रात्री जेवण केल्यावर अपचन किंवा ब्लोटिंगची समस्या होते. अशात त्यांना झोपही चांगली येत नाही. यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित एका स्टडीनुसार, जेवण केल्यावर थोडा वेळ चालल्याने अन्न चांगलं पचन होण्यास मदत मिळते. असं केल्याने शरीरात जास्त ॲसिड होत नाही आणि गॅसही होत नाही.
रात्री चालण्याची पद्धत
रात्री जेवण झाल्यावर चालताना स्पीड हळूवार आणि आरामदायक ठेवा.
एखादी शांततापूर्ण जागेची निवड करा.
चालल्याने आरामासाठी स्ट्रेचिंग करा.
(सोशल मीडियावरून साभार)
महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…