पोळी, ज्वारीची भाकरी, तांदळाची भाकरी असे प्रकार आपण वर्षभर खातच असतो. पण हिवाळ्याची चाहुल लागताच आजही अनेक घरांमध्ये बाजरी आणली जाते. आणि मग पाेळी, ज्वारीची भाकरी याऐवजी आठवड्यातून कधी कधी बाजरीची भाकरीही दिसते.
बाजरीचा भात किंवा खिचडी हा देखील हिवाळ्यातला एक पारंपरिक पदार्थ. भात किंवा भाकरी या माध्यमातून या दिवसांत बाजरी पोटात जाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गरजेचे आहे.
हिवाळ्यात बाजरी खाण्याचे फायदे
१) बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात तुमचे शरीर उबदार तर ठेवतेच पण त्यासोबतच भरपूर उर्जाही देते. तूप, गूळ, दूध या पदार्थांसोबत ही भाकरी खावी. तसेच भाकरी गरम असताना खाणे अधिक चांगले.
२) बाजरी हे लाे कॅलरी डाएट मानले जाते. त्यामुळे वेटलॉस करत असाल, तरीही बाजरीची भाकरी तुम्हाला चालू शकते.
३) हिवाळ्याच्या दिवसांत अनेकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी बाजरी उपयुक्त ठरते. कारण बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. त्यामुळे पोट साफ व्हायला मदत होते.
४) बाजरी नियमित खाल्ल्याने शरीरातील बॅड काेलेस्टरॉलचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित राहतो.
५) बाजरीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी या दिवसांत बाजरी नियमितपणे खाण्याचा सल्ला दिला जातो.
६) याशिवाय बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस ही खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात.
(सोशल मीडियावरुन साभार)
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…