आरोग्य

सकाळी उठल्या-उठल्या रिकाम्यापोटी फक्त ‘हे’ एक काम करा

सकाळी रिकाम्यापोटी गरम पाणी पिण्याचे फायदे

साधं गरम पाणी जर तुम्ही रिकाम्यापोटी प्यायलं तर ते आरोग्यासाठी चांगलंच आहे. पण जर गरम पाण्यात तुम्ही चिमूटभर किसलेलं आलं, हळद, मिरेपूड, १ टीस्पून तूप असं सगळं साहित्य घालून ते प्यायलं तर ते अधिक उत्तम. यासाठी पाणी पातेल्यात टाकून गॅसवर गरम करायला ठेवा. त्यात हळद, मिरेपूड, आलं घाला आणि पाण्याला एक उकळी येऊ द्या. त्यानंतर हे पाणी जेव्हा पिता येण्याजोगं होईल तेव्हा ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यात तूप टाकून प्या.

रिकाम्यापोटी काेमट पाणी का प्याव

१) रात्रभर आपण पाणी प्यायलेलं नसतं. त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी सगळ्यात आधी गरम पाणी प्यावं.

२) गरम पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया, चयापचय क्रिया अधिक चांगली होते. यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साठून राहण्याचे प्रमाण बरेच कमी होते.

३) हळद आणि आल्यामध्ये असणारे ॲण्टीबॅक्टेरियल घटक शरीर निरोगी राहण्यासाठी आणि शरीरावरची सूज कमी करण्यासाठी मदत करतात.

४) गरम पाण्यात मिरेपूड, हळद, आलं टाकून प्यायल्याने कफ, सर्दीचा त्रास होत नाही. तसेच राेगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

५) गरम पाण्यात जर लिंबाचा थोडा रस टाकून प्यायलं तर त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी मिळते. आरोग्यासोबतच त्वचेचं सौंदर्य टिकून ठेवण्यासाठीही मदत होते. नॅचरल डिटॉक्स ड्रिंक म्हणून हे पाणी ओळखलं जातं. कारण हे पाणी प्यायल्यामुळे शरीरातले विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर स्वच्छ होण्यास मत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…

23 मिनिटे ago

शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…

3 तास ago

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त राज्यभर जनजागृती व नेत्र चिकित्सा शिबिरे; चंद्रकांत पाटील

मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…

2 दिवस ago