आरोग्य

रात्री जेवण झाल्यावर तुम्ही या २ गोष्टी करा

आपण दिवसभर दमून घरी येतो. थोडे फ्रेश होतो आणि भूक लागल्याने काहीतरी खातो नाहीतर चहा घेतो. मग थोडा वेळाने जेवण करतो आणि टीव्हीसमोर बसून राहतो. अशाप्रकारे जेवण झाल्या झाल्या लगेच बसून राहणे आरोग्यासाठी घातक असते. त्यापेक्षा जेवण झाल्यावर किमान १५ ते २० मिनीटे तरी चालायला हवे.

मधुमेह, बीपी, हार्मोनल प्रॉब्लेम, निद्रानाश, नैराश्य, उत्साहाची कमतरता अशा एक ना अनेक समस्यांनी लोक त्रस्त असल्याचे जवळपास प्रत्येक घरात बघायला मिळते. त्यातच भर पडते ती स्क्रीन टाइमची. एकीकडे कमी झालेली हालचाल, व्यायामाची कमतरता आणि दुसरीकडे सतत डोळ्यासमोर असणारी स्क्रीन. पण आजकाल धावपळीच्या आणि व्यस्त जीवनशैलीत व्यायामाला वेळच मिळत नाही.

1) जेवणानंतर शतपावली: आपण आपल्या आजीकडून ऐकलेले असते जेवल्या जेवल्या बसू नये. जरा चालावे, वज्रासनात बसावे म्हणजे अन्न नीट पचते. पण आपण या जुन्या गोष्टी म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. याला सबब परत वेळेची असतेच आणि मग अनेक व्याधींना बळी पडतो. पण तुमच्या अशा अनेक तक्रारींवर आजीचा हा सल्ला खूप उपयुक्त आहे जो आता तज्ज्ञही देत आहेत.

रात्रीच्या जेवणानंतर किमान अर्धा तास चालणे आवश्यक आहे. हे चालणे म्हणजे वेगात किंवा हृदयाचे ठोके मोजत केलेला व्यायाम नसावा. शतपावली करावी, चालण्याचा मंद वेग एक सारखा ठेवत किमान शंभर पावले चालावी असे तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे जेवलेले अन्न नीट पचते. अन्नाचे नीट पचन झाल्याने शरीराला योग्य ते पोषण मिळते, यामुळे अनेक आजार टळतात. असे केल्याने सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे उत्साह वाढतो. गॅसेस, अपचन, अॅसिडिटी असे त्रास होत नाहीत. याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

2) मोबाइल टाळावा: आजकाल प्रत्येकच काम इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आधारे होते. लॅपटॉप, मोबाइल, टीव्ही यातच प्रत्येक जण दिवसभर गुंतलेला असल्याने याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही घातक परिणाम होत आहे. मेंदूला आणि डोळ्यांना डोळ्यांसमोर सतत स्क्रीनची सवय झाल्याने निद्रानाशाची समस्याही वाढलेली दिसते. त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान एक तास आधी मोबाइल, टीव्ही, फोन, टॅबलेट अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरणे बंद करावे. त्यातून निघणार्‍या ब्लू लाईट झोपेवर वाईट परिणाम करत असल्याने निद्रानाशाची समस्या उद्भवते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

9 तास ago

घरातून रुसून निघालेल्या अल्पवयीन मुलाचा दौंड रेल्वे स्थानकावर सुखरूप शोध; समन्वयातून मोठी दुर्घटना टळली

दौंड: घरातून रुसून आंध्र प्रदेशातील रेणुगुंठा रेल्वे स्थानकावरून मदुराई–मुंबई एक्स्प्रेसमध्ये बसून निघालेल्या पवन भाटी या…

11 तास ago

शिरूर! करडे गावात मध्यरात्री पिस्तुलातून तीन राऊंड फायर; गुन्हा दाखल; पाहा नावे…

सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…

17 तास ago

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

1 दिवस ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

1 दिवस ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 दिवस ago