आरोग्य

कोणती डाळ शरीरासाठी फायदेशीर असते

डाळ भारतीय खाण्याचा एक महत्वपूर्ण आहार आहे. डाळीच्या सेवनानं शरीराला प्रोटीन्स, फायबर्स, व्हिटामीन्स आणि मिनरल्स मिळतात तसंच आरोग्यही चांगले राहते. पण डाळ प्रत्येकाच्याच शरीरासाठी सारखा परिणाम करत नाही. प्रसिद्ध आयुर्वेदीक डॉक्टर सलीम जैदी यांनी आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवर याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ते सांगतात की प्रत्येक डाळीचा प्रभाव वेगवेगळा असतो. म्हणून आपल्या बॉडी टाईपनुसार डाळीची निवड करायला हवी. कोणती डाळ खाल्ल्यानं काय फायदे मिळतात समजून घेऊ.

मूग डाळ

मुगाची डाळ पचायला हलकी असते. ज्यामुळे पोटावर अतिरिक्त ताण येत नाही. गॅस, एसिडिटी कमी होते. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही मुगाच्या डाळीचा आहारात समावेश करू शकता. ही डाळ खाल्ल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतील.

मसूर डाळ

मसूर डाळीत आयर्न मोठ्या प्रमाणात असते. रक्ताची कमतरता असल्यास मसूर डाळीचे सेवन करायला हवे. ज्यामुळे शरीरात एनर्जी टिकून राहते आणि थकवा कमी येतो. काही लोकांना मसूर डाळ खाल्ल्यामुळे गॅस होतो आणि शरीर कमकुवत होते. मसूर डाळ योग्य प्रमाणातच खायला हवी.

चणा डाळ

चणा डाळीत प्रोटीन, फायबर्स मोठ्या प्रमाणात असतात. ज्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. कारण हळूहळू पचन होते. ही डाळ ब्लड शुगर वेगानं वाढू देत नाही. पचायला जड असते त्यामुळे कमकुवत पचन असलेल्या लोकांनी या डाळीचे कमी प्रमाणात सेवन करावे.

तुरीची डाळ 

तुरीची डाळ एनर्जी देण्यासाठी संतुलित मानली जाते. ही डाळ जास्त जड नसते किंवा जास्त हलकीही नसते. म्हणून रोज खाण्यासाठी तुरीची डाळ उत्तम पर्याय आहे. तांदूळ आणि तुरीच्या डाळीची खिचडी तुम्ही खाऊ शकता.

उडीद डाळ

उडीदाची डाळ हाडं, मांसपेशींसाठी फायदेशीर मानली जाते. यात कॅल्शियम आणि इतर पौष्टीक तत्व असतात. ज्यामुळे गॅस, एसिडिटी, पाईल्सची समस्या उद्भवत नाही. म्हणून उडीदाची डाळ खायला हवी.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

4 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

4 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

4 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

6 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

18 तास ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

18 तास ago