दही आणि ताक हे दोन्हीही खरंतर अतिशय पौष्टिक पदार्थ. पण कधी कधी काही जणांना दही खाणं अजिबात सहन होत नाही. दही खाल्लं की लगेच सर्दी होते, ॲसिडीटी होते किंवा इतर काही त्रास होतात. त्याउलट काही जणांना मात्र दही खाल्ल्याने काहीच त्रास होत नाही. उलट दही खाल्लं की ते फ्रेश होतात. मग दही खाणं नेमकं कोणासाठी चांगलं असतं आणि ताक पिणं कोणाला फायदेशीर ठरत. या दोन्ही पदार्थांपैकी कोणता पदार्थ आपल्या तब्येतीच्या दृष्टीने आपल्यासाठी अधिक चांगला आहे हे प्रत्येकजण अगदी सहज ओळखू शकतो.
दही आणि ताक यापैकी कोणता पदार्थ तुमच्यासाठी अधिक चांगला
1) सगळ्यात पहिलं म्हणजे दही पचायला थोडं जड असतं. त्यामुळे ते रात्रीच्यावेळी खाऊ नये असा सल्ला दिला जातो. त्याउलट ताकामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्याने ते पचायला अगदी सोपं असतं. शिवाय ताकामध्ये आपण मीठ, जिरेपूड, मिरच्या, कोथिंबीर असे पचनासाठी पुरक पदार्थ घालतो. त्यामुळे ते अधिक पाचक होतं. म्हणूनच ज्यांना पचनाचा त्रास असतो अशा लोकांनीं दही खाण्याऐवजी ताक प्यावं.
2) दह्याला आपण थंड पदार्थ समजतो. पण खरंतर ते उष्ण असतं. त्यामुळे ज्यांना अॅसिडीटी, पित्त असा त्रास होतो अशा लोकांनी दही खाणं टाळावं. अशा लोकांनी ताक पिण्यास प्राधान्य द्यावं कारण ताक थंड असतं.
3) ज्या लोकांची कफ प्रकृती असते अशा लोकांनाही दही खाणं टाळावं. कारण त्यांना दह्यामुळे सर्दी, शिंका, कफ असा त्रास होऊ शकतो. त्या लोकांना ताक पिणं मात्र चालतं. ताक तुम्ही तिन्ही ऋतूंमध्ये घेऊ शकता आणि कफ, वात, पित्त अशा तिन्ही प्रकृतीच्या लोकांना चालत.
(सोशल मिडीयावरून साभार)
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…