आरोग्य

दही आणि ताक आपल्या आरोग्यासाठी दोन्हीपैकी अधिक चांगलं काय

दही आणि ताक हे दोन्हीही खरंतर अतिशय पौष्टिक पदार्थ. पण कधी कधी काही जणांना दही खाणं अजिबात सहन होत नाही. दही खाल्लं की लगेच सर्दी होते, ॲसिडीटी होते किंवा इतर काही त्रास होतात. त्याउलट काही जणांना मात्र दही खाल्ल्याने काहीच त्रास होत नाही. उलट दही खाल्लं की ते फ्रेश होतात. मग दही खाणं नेमकं कोणासाठी चांगलं असतं आणि ताक पिणं कोणाला फायदेशीर ठरत. या दोन्ही पदार्थांपैकी कोणता पदार्थ आपल्या तब्येतीच्या दृष्टीने आपल्यासाठी अधिक चांगला आहे हे प्रत्येकजण अगदी सहज ओळखू शकतो.

दही आणि ताक यापैकी कोणता पदार्थ तुमच्यासाठी अधिक चांगला

1) सगळ्यात पहिलं म्हणजे दही पचायला थोडं जड असतं. त्यामुळे ते रात्रीच्यावेळी खाऊ नये असा सल्ला दिला जातो. त्याउलट ताकामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असल्याने ते पचायला अगदी सोपं असतं. शिवाय ताकामध्ये आपण मीठ, जिरेपूड, मिरच्या, कोथिंबीर असे पचनासाठी पुरक पदार्थ घालतो. त्यामुळे ते अधिक पाचक होतं. म्हणूनच ज्यांना पचनाचा त्रास असतो अशा लोकांनीं दही खाण्याऐवजी ताक प्यावं.

2) दह्याला आपण थंड पदार्थ समजतो. पण खरंतर ते उष्ण असतं. त्यामुळे ज्यांना अॅसिडीटी, पित्त असा त्रास होतो अशा लोकांनी दही खाणं टाळावं. अशा लोकांनी ताक पिण्यास प्राधान्य द्यावं कारण ताक थंड असतं.

3) ज्या लोकांची कफ प्रकृती असते अशा लोकांनाही दही खाणं टाळावं. कारण त्यांना दह्यामुळे सर्दी, शिंका, कफ असा त्रास होऊ शकतो. त्या लोकांना ताक पिणं मात्र चालतं. ताक तुम्ही तिन्ही ऋतूंमध्ये घेऊ शकता आणि कफ, वात, पित्त अशा तिन्ही प्रकृतीच्या लोकांना चालत.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

12 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

12 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

12 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

12 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

1 दिवस ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

1 दिवस ago