आजकाल कामाच्या वाढलेल्या ताणामुळे बरेच लोक तणावात असतात. नंतर याची लक्षणं वाढतात. कामाचा ताण, कुटुंबाची वाढती जबाबदारी, लाइफस्टाईलच्या चुकीच्या सवयी यामुळे दिवसेंदिवस ताण वाढतो. पण अनेकदा काही व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळेही सुद्धा ही समस्या होते. तणाव वाढला की, व्यक्तीला घाबरल्यासारखं वाटतं. तणावामुळे व्यक्तीचं मानसिक आरोग्य प्रभावित होतं. अशात आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आहारात काही व्हिटॅमन्सचा समावेश करणं गरजेचं असतं.
व्हिटॅमिन बी 1
व्हिटॅमिन बी 1 म्हणजे थियामनच्या कमतरतेमुळे व्यक्तीला घाबरल्यासारखं वाटू शकतं. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी 1 कमी होतं तेव्हा डिप्रेशन, चिंता, चिडचिडपणा आणि झोप न येणं अशा समस्या होतात. व्हिटॅमिन बी1 मुळे मेंदुत ग्लूकोजला ऊर्जेल बदलण्याचं काम होतं. जर हे व्हिटॅमिन शरीरात पुरेसं नसेल तर थकवा, भूक न लागणं आणि पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर तुम्हाला नेहमीच घाबरल्यासारखं वाटत असेल तर व्हिटॅमिन बी1 असलेल्या फूड्सचा आहारात समावेश करावा.
व्हिटॅमिन डी
व्हिटॅमिन डी शरीरासाठी फार महत्वाचं असतं. यानं हाडं आणि मासंपेशी मजबूत होतात. शरीरात व्हिटॅमिन डी कमी झालं की, मानसिक आरोग्याची समस्या होत. घाबरलेपणाही व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे वाटू शकतो. जर तुम्हाला पुन्हा पुन्हा तणाव, घाबरलेपणा किंवा चिंता वाटत असेल तर डाएटमध्ये व्हिटॅमिन डी देणाऱ्या फूड्स समावेश करावा.
व्हिटॅमिन बी
व्हिटॅमिन बी महत्वाच्या तत्वांपैकी एक आहे. जेव्हा शरीरात याची कमतरता होते, तेव्हा थकवा, चिंता, चिडचिडपणा जाणवतो. व्हिटॅमिन बी मुळे मूड आणि ऊर्जेत वाढ होते. मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12 आणि बी9 गरजेचे असतात. त्याशिवाय आयर्न, आयोडीन, सेलेनियम, मॅग्नेशिअम आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड कमी झाल्यावरही घाबरल्यासारखं वाटू शकतं.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई-गोवा महामार्गाच्या टोलनाक्यांपासून जलजीवन मिशनच्या ४३८ कोटींपर्यंत मुद्दे केंद्रीय मंत्र्यांकडे मांडले मुंबई: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात…
पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या…
सीमांकन, महिला आरक्षण आणि FCRA विधेयकांवरून सरकार-विरोधक आमनेसामने नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा…
जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना…
पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची…
शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद…