काही मोजक्या भागांचे अपवाद सोडले तर भारतात बहुतांश ठिकाणी बारा महिने भरपूर सुर्यप्रकाश असतो. उन्हाळ्यात तर उन्हाचा कडाका विचारायलाच नको, पण एरवीही अगदी नको- नको होऊन जातं एवढं ऊन आपल्याकडे असतं. व्हिटॅमिन डी मिळविण्यासाठी सुर्यप्रकाश, सकाळचं कोवळं ऊन हा एक सर्वोत्तम स्त्रोत आहे, असं म्हणतात. मग असं असताना बहुसंख्य भारतीयांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची एवढी कमतरता का दिसून येते, हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. त्यातही महिलांचे प्रमाण जरा जास्तच आहे.
शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता का असते
भरपूर ऊन असूनही जीवनशैलीमध्ये झालेला बदल हा बहुसंख्य भारतीयांच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता असण्याचं एक प्रमुख कारण आहे, असं डॉ. मिनेश मेहता यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
हल्ली शहरी लोक जास्त उन्हात जातच नाहीत. घरातून गाडीमध्ये, गाडीमधून ऑफिसमध्ये असा त्यांचा प्रवास असतो. लहान मुलांचंही तसंच आहे. मैदानावर जाऊन सुर्यप्रकाशात खेळण्याचं प्रमाण बरंच कमी झालं आहे. यामुळे ऊन असूनही आपल्याला त्यातून व्हिटॅमिन डी मिळवता येत नाही.
शरीराला व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी पाठीवर सुर्यप्रकाश पडणे गरजेचे आहे.
पण आपण ज्या पद्धतीचे कपडे घालतो, त्यानुसार पाठीवर सुर्यप्रकाश थेट पडत नाही. त्यासाठी पाठ उघडी राहील अशा पद्धतीने सकाळी थोडा वेळ काढून कोवळ्या सुर्यप्रकाशात बसायला हवं.
तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हल्ली सकाळच्या कोवळ्या उन्हात घराबाहेर पडण्याची वेळ आली तरी लोक भरपूर प्रमाणात सनस्क्रिन लावून जातात.
महिला चेहऱ्याभोवती स्कार्फ लपेटून घेतात. अंगात सनकोट, ग्लोव्ह्ज घालतात. यामुळे त्यांच्या शरीराचा खूपच थोडा भाग थेट सुर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो. आपल्या जीवनशैलीमध्ये आणि आहारात थोडा बदल केला तर नक्कीच शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता भरून काढता येते.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…