आरोग्य

दात पिवळे, दातांवरचा पिवळट थर जाण्यासाठी ५ उपाय, दात दिसतील स्वच्छ-कीड लागणार नाही

बोलताना किंवा हसताना नजर आपसुकच दातांवर जाते. दातांची ठेवण जरी वेगवेगळी असली तरी सगळ्यांचे दात छान दुधाळ पांढरेच असतात. दात पिवळे पडतात त्यामागे अनेक कारणे आहेत. मात्र असे पिवळे झालेले दात विचित्र दिसतात.

फक्त दिसायलाच पिवळे दात वाईट नसतात. दात पिवळे दिसतात कारण त्यावर थर जमा झाला असतो. त्यामुळे दात फक्त घाण दिसत नाहीत खराबही होतात. त्यामुळे दात पिवळे होणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे असते.

काही गोष्टींची काळजी घेतली तर दातांचा पिवळटपणा कमी करता येतो. काही सवयी लावून घ्या म्हणजे दात खराबही होणार नाहीत. किडणारही नाहीत.

मोहरीचे तेल हाडांसाठी उपयुक्त असते. तसेच दातांसाठीही फायद्याचे असते. मीठ व मोहरीचे तेल याची पेस्ट करायची आणि दातांना लावायची दातांचा पिवळेपणा कमी होतो.

सकाळी उठल्यावर दात घासणे जेवढे गरजेचे असते तेवढेच रात्री झोपताना दात स्वच्छ करणे गरजेचे असते. चांगल्या दर्जाचा ब्रश दातांसाठी वापरा. तसेच वेळोवेळी ब्रश बदला.

सकाळी व संध्याकाळी चहा किंवा कॉफी प्यायची सवय आपल्याला असते. तसेच ज्यूस, सरबत आपण पितो. ते पिऊन झाल्यावर चुळ भरायला विसरू नका.

माऊथवॉशने तोंड धुवायचे. चांगली खळखळून चुळ भरा. अन्नाचा थर दातांवर तयार होणार नाही. याची काळजी घ्या.

सफरचंद, संत्र अशी फळे खा. दात स्वच्छ होण्यासाठी ही फळे उपयुक्त असतात. तसेच गाजर खा. इतरही फळे खाणे दातांसाठी चांगले असते. अन्नरसाचा थर कमी करतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

35 मिनिटे ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

40 मिनिटे ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

44 मिनिटे ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

48 मिनिटे ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

12 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

12 तास ago