महाराष्ट्र

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव शेरी येथील गुरुनानक स्वीट मार्टमधून खरेदी केलेले पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या भावाच्या नवीन कारच्या डिलिव्हरीसाठी कुटुंबीय आणि मित्रमंडळी शोरूममध्ये जमली होती. यावेळी आनंद साजरा करण्यासाठी पेढे वाटण्यात आले. मात्र काही तासांतच उपस्थितांपैकी अनेकांची तब्येत बिघडू लागली. पीडित आसिफ काजी यांनी सांगितले की, त्यांच्या 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील सात ते आठ जणांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास झाला. मुलीला गंभीर डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले, तर इतरांनाही वैद्यकीय उपचार घ्यावे लागले.

दरम्यान, खराडी आणि वडगाव शेरी परिसरातील इतर काही कुटुंबांनीही गुरुनानक डेरीमधून आणलेल्या पेढ्यांमुळे अशाच प्रकारे आजारी पडल्याचा दावा केला आहे. एका तक्रारदार डॉक्टर महिलेच्या माहितीनुसार, या प्रकारात सुमारे 40 ते 45 जण बाधित झाले असावेत.

घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) तातडीने सक्रिय झाले असून गुरुनानक डेरीचे विक्री केंद्र आणि उत्पादन युनिट सील करण्यात आले आहे. पेढे आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. भेसळ, दूषित घटक, निकृष्ट दर्जाचा खवा, स्वच्छतेचा अभाव किंवा जुनी मिठाई यापैकी नेमके कोणते कारण जबाबदार आहे, याचा तपास सुरू आहे.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर या प्रकरणातील कारवाईला वेग आला असून तपास अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे. पुण्यातील हा प्रकार सध्या नागरिकांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

5 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

5 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

5 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

5 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

7 तास ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

7 तास ago