महाराष्ट्र

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे. प्रियकर सक्षम ताटेच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या आंचल मामीडवारने आता ते घर सोडल्याने पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.

काही महिन्यांपूर्वी आंचल मामीडवारच्या प्रियकराचा, सक्षम ताटेचा, तिच्याच वडिलांनी आणि भावाने कथितरित्या खून केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात आंचलने आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तसेच सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांचा आधार बनून त्यांच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतल्याने ती चर्चेत आली होती.

मात्र, आता आंचलने सक्षमचे घर सोडले असून ती आपल्या आजीसोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना आंचलने सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, सक्षमचा भाऊ तिच्याशी अयोग्य वर्तन करत होता तसेच अनेकदा चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. याबाबतची माहिती आपण कुटुंबीयांनाही दिली होती, मात्र त्यांनी विश्वास ठेवला नसल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावा आंचलने केला आहे.

दरम्यान, आंचलच्या आरोपांनंतर सक्षमच्या आईने आणि आत्याने तिच्या दाव्यांना फेटाळून लावत पलटवार केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी काही मोबाईल चॅट्स दाखवत सक्षमच्या भावाला बदनाम करू नये, अशी विनंती केली. “आता आमच्याकडे एकच मुलगा उरला आहे. त्याने कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही. तो आंचलला नेहमी ‘वहिनी’ म्हणूनच संबोधत होता,” असा दावा कुटुंबीयांनी केला.

यावेळी कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांसमोर काही संदेशही सादर केले. या संदेशांमध्ये आंचल आणि सक्षमच्या भावामध्ये संवाद झाल्याचे दिसून येत असून, त्यावरून दोघांमध्ये नियमित संपर्क होता, असा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

सध्या या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे केले जात असल्याने सत्य नेमके काय आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. संबंधित आरोपांची अधिकृत चौकशी किंवा कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

50 सेकंद ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

7 मिनिटे ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

9 मिनिटे ago

ऑपरेशन टायगर! उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का? सहा खासदारांच्या फुटीची चर्चा, ओमराजे निंबाळकर दिल्लीत

दिल्ली: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील…

2 तास ago

कौटुंबिक वादातून पोलिस शिपायाची आत्महत्या

चंदगड: नागरदळे (ता. चंदगड) येथे मीरा-भाईंदर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलिस शिपाई दयानंद कृष्णा पाटील (वय…

2 तास ago

एकल पाल्य विद्यार्थ्यांसाठी विशेष ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (MSFDA) यांच्या वतीने राज्यातील एकल पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहाय्य,…

4 तास ago