सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतराला मंत्रिमंडळाची मान्यता; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला यश
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर कासार) व टाकळगाव (ता. गेवराई) येथील कोल्हापूर पद्धतीच्या तिन्ही बंधाऱ्यांचा विस्तार करून त्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत असून हा निर्णय उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पालकमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर कासार) व टाकळगाव (ता. गेवराई) येथील कोल्हापूर पद्धतीच्या तिन्ही बंधाऱ्यांचा विस्तार करून त्यांना बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या निर्णयामुळे शिरूर – कासार व गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बॅरेज झाल्यानंतर या भागातील पाणीसाठ्यात वाढ होऊन परिसरातील विहिरी, बोअरवेलांची पाणी पातळी तसेच भूजलस्तर उंचावणार, परिणामी खरीप-रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.शेतकरी व नागरिकांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असून, बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले जात आहेत.
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…
सामान्यपणे एक्सपर्ट दिवसातून ७-८ तास झोप घेण्याचा सल्ला देत असतात. कारण इतकी झोप शरीरासाठी गरजेची…
रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत…
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलण्यात पटाईत असून त्यांना खोटे बोलण्यातील नोबेल पुरस्कारच दिला…
मुंबई: राजकारणाच्या मैदानात कधी तलवारी चालतात, कधी घोषणांचा पाऊस पडतो; पण महाराष्ट्रात आता सरकारी जाहिरातींच्या…
नवी मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राज्यात प्रथमच राबविण्यात येणाऱ्या नियतकालिक…