सिंदफणा नदीवरील तीन बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतराला मंत्रिमंडळाची मान्यता; उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला यश
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर कासार) व टाकळगाव (ता. गेवराई) येथील कोल्हापूर पद्धतीच्या तिन्ही बंधाऱ्यांचा विस्तार करून त्यांचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत असून हा निर्णय उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे शक्य झाला आहे. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पालकमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.
बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगाव, ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरुर कासार) व टाकळगाव (ता. गेवराई) येथील कोल्हापूर पद्धतीच्या तिन्ही बंधाऱ्यांचा विस्तार करून त्यांना बॅरेजमध्ये रुपांतर करण्याच्या निर्णयामुळे शिरूर – कासार व गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. बॅरेज झाल्यानंतर या भागातील पाणीसाठ्यात वाढ होऊन परिसरातील विहिरी, बोअरवेलांची पाणी पातळी तसेच भूजलस्तर उंचावणार, परिणामी खरीप-रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.शेतकरी व नागरिकांकडून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत असून, बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले जात आहेत.
मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज चुकीच्या पद्धतीने रद्द…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात आज (शुक्रवार) ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर वार्डनिहाय आरक्षण सोडतीची प्रक्रिया…
शिरूर (तेजस फडके) : रांजणगाव एमआयडीसी परिसरातील एका नामांकित औषध निर्मिती कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंपनी…
मुंबई: कुर्ला मतदारसंघातील लोकाभिमुख विकासकामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. नेहरूनगर येथील पोलीस…
मुंबई: राजकारणात काही गोष्टी इतक्या उघडपणे घडतात की त्यावर भाष्य करण्यासाठी दुर्बिणीची गरज नसते; फक्त…
मुंबई: राज्यातील तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी…