महाराष्ट्र

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि मनमानी पद्धतीने रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ मुंबईतील दादर येथे काँग्रेसने तीव्र आंदोलन केले. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात निवडणूक आयोग आणि केंद्रातील भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

‘जब जब सरकार डरती है, पुलिस को आगे करती है’, ‘लोकशाही नाही हुकुमशाही आहे’, ‘निवडणूक आयोग भाजपाची शाखा आहे’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनस्थळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत, “मिनाक्षी नटराजन यांच्या उमेदवारी अर्जाला कोणतेही कायदेशीर अडथळे नसताना तो रद्द करण्यात आला. हा निर्णय लोकशाही आणि संविधानाच्या मूल्यांवर आघात करणारा आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे,” असे म्हटले.

आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झिनत शबरीन यांच्यासह ब्रिज दत्त, राणी अग्रवाल, जोजो थॉमस, प्रकाश सोनावणे, श्रीरंग बरगे, विश्वजित हाप्पे, मनीष गणोरे, झीशान अहमद, राजा ठाकूर, श्रुती म्हात्रे, डॉ. मनीष पाटील, राहुल पिंगळे, नवीन सिंग आणि शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेसने या प्रकरणाविरोधात देशभरात लोकशाहीच्या संरक्षणासाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

2 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

2 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

3 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

13 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

14 तास ago

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कारभारावर काँग्रेसचा हल्लाबोल

गिरीश महाजनांच्या वक्तव्यावरून हकालपट्टीची मागणी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधानपदाच्या…

14 तास ago