लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपरी: आपण लग्न करणार आहोत, तु माझी बायको आहे असे बोलून लग्नाचे आमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आली आहे.

शारीरिक संबंधातून मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. याबाबत पवन उर्फ गुरु कैलास ओव्हाळ याच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात IPC 376, 376 (2) (एन) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय ४२) हिंजवडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि. ३) रोजी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पवन उर्फ गुरु ओव्हाळ (वय १९) रा. थेरगाव, मुळ रा. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीवर सांगवी पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट चा गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात तो कारागृहात आहे.

आरोपीने फिर्यादी यांच्या १५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी जवळीक साधली. ‘आपण लग्न करणार आहोत, तु माझी बायको आहे’, असे बोलून त्याने मुलीसोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. तिला मुल होऊन त्याचा देखील मृत्यू झाला. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक एस. जे. गोडे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

5 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

13 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

13 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

13 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

13 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

13 तास ago