महाराष्ट्र

मुलींना १००% तर मुलांना ५०% फी माफी; नियम मोडणाऱ्या कॉलेजांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय लागू केला आहे. या निर्णयानुसार मुलींना १०० टक्के शिक्षण शुल्क माफी तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना ५० टक्के शुल्क माफी देण्यात येणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत याबाबत माहिती देताना स्पष्ट इशारा दिला की, शासनाच्या निर्णयानंतरही जर एखादे महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून फी आकारत असेल किंवा अवास्तव ‘इतर फी’ घेत असेल, तर त्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

यासोबतच विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या १७ वरून ८ वर आणण्यात आली असून अर्जातील माहितीचे रकानेही १३८ वरून ६६ करण्यात आले आहेत. तसेच आता CET चा डेटा थेट वापरला जाणार असल्याने विद्यार्थ्यांना वारंवार जात प्रमाणपत्र किंवा इतर कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही.

दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेतही सुविधा देण्यात आली आहे. शहरांच्या वर्गवारीनुसार विद्यार्थ्यांना १० महिन्यांसाठी भत्ता मिळणार आहे. त्यानुसार मुंबई व पुणे सारख्या शहरांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमहा ६ हजार रुपये, महसूल विभाग मुख्यालय असलेल्या शहरांत ५१०० रुपये आणि तालुका स्तरावरील ठिकाणी ४८०० रुपये निर्वाह भत्ता देण्यात येणार आहे.

तसेच शासनाकडून ‘कमवा आणि शिका’ ही नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली असून सुमारे ५ लाख विद्यार्थ्यांना दरमहा २ हजार रुपये मानधन देण्याची तयारी सुरू आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ग्रंथालय व्यवस्थापन, वृक्षारोपण किंवा सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घ्यावा लागणार आहे.

विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी राज्यात ४० विशेष मदत केंद्रे सुरू करण्यात येणार असून, फॉर्म भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी येथे तांत्रिक मार्गदर्शन दिले जाणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…

12 तास ago

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…

14 तास ago

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…

14 तास ago

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…

14 तास ago

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

1 दिवस ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

1 दिवस ago