छत्रपती संभाजीनगर: ऑटोमोबाईल क्षेत्रातील दिग्गज कंपनी Mahindra & Mahindra छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा औद्योगिक प्रकल्प उभारण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अतिरिक्त शेंद्रा अर्थात जयपूर एमआयडीसी परिसरातील सुमारे १५० एकर जागेची नुकतीच पाहणी केली असून ही जागा कंपनीला पसंत पडल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेंद्रा–जयपूर एमआयडीसीमध्ये ऑटोमोबाईल उत्पादनाशी संबंधित मोठा प्रकल्प उभारण्याचे नियोजन सुरू आहे. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून परिसर, पायाभूत सुविधा आणि उपलब्ध जमीन याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर परिसरात उद्योगांची मागणी झपाट्याने वाढत असून बिडकीन व शेंद्रा येथील Aurangabad Industrial City मध्ये अनेक मोठ्या कंपन्या दाखल झाल्या आहेत. Toyota आणि JSW Group सारख्या कंपन्यांच्या आगमनामुळे औद्योगिक भूखंडांची मागणी वाढली आहे. त्यामुळे मोठ्या भूखंडांची कमतरता निर्माण झाल्याने उद्योग विभागाने जयपूर एमआयडीसीचा पर्याय सुचवला असल्याची माहिती आहे.
महिंद्रा कंपनीला एकूण सुमारे ३०० एकर जागेची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी १५० एकर जमीन ऑरिक परिसरात आणि उर्वरित १५० एकर जमीन जयपूर एमआयडीसीमध्ये देण्याचे नियोजन असून दोन्ही ठिकाणी मिळून मोठा औद्योगिक क्लस्टर उभारण्याची शक्यता आहे.
या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि कंपनीदरम्यान लवकरच सामंजस्य करार (MoU) होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप एमआयडीसीकडे ५ टक्के रक्कम भरलेली नसली तरी कंपनीच्या पाहणीनंतर सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
हा प्रकल्प प्रत्यक्षात आला तर छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळण्यासोबतच स्थानिक युवकांसाठी हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच ऑटोमोबाईल आणि ancillary उद्योगांनाही मोठी चालना मिळू शकते.
पालघर: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या…
मुंबई: ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्याला…
मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवित, इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे वळण आले असून Mamata Banerjee यांनी पराभव मान्य…
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card)…
रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरात परप्रांतीय कामगारांवर हल्ले, लूटमार…