महाराष्ट्र

दहावी-बारावीची परीक्षा आता वर्षातून दोनदा – शासनाचा निर्णय लवकरच

मुंबई: महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित शिक्षणव्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सर्जनशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार आहे.

महत्त्वाचे बदल:

शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून होणार

२०२६-२७ पासून शाळेचे शैक्षणिक वर्ष जूनऐवजी १ एप्रिलला सुरू होणार आहे.

अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल.

परीक्षेच्या पद्धतीतील बदल:

दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन होणार

1) मुख्य परीक्षा (Main Exam)

2) श्रेणी सुधारणा परीक्षा (Improement Exam)

परीक्षांमध्ये घोकंपट्टीऐवजी *रचनात्मक शिक्षणावर भर देण्यात येणार.

अभ्यासक्रम आणि विषय निवडीतील स्वातंत्र्य:

CBSE च्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार.

विद्यार्थ्यांना आवडीनुसार विषय निवडण्याची मुभा राहणारा आहे.

गणित व विज्ञान यांचे स्वरूप अधिक प्रगत होणार.

अध्यापनातील बदल:

तासिकेची वेळ ४५ मिनिटांऐवजी ५० मिनिटे करण्यात येईल.

शाळांच्या वेळा दोन ✌🏻सत्रांमध्ये विभागल्या जातील.

‘दप्तरमुक्त शाळा’ उपक्रम:

६वी ते ८वीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी १० दिवस *दप्तरमुक्त शाळा* भरवण्यात येणार

कलेच्या विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप व सर्जनशीलतेसाठी प्रोत्साहन दिला जाईल.

टप्प्याटप्प्याने धोरणाची अंमलबजावणी:

२०२५-२६: इयत्ता दुसरीपर्यंत अभ्यासक्रम बदल करण्यात येईल.

२०३०: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णतः लागू होईल.

बदलांमागील उद्दिष्टे:

विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण.

ताणमुक्त व आनंददायी शिक्षण पद्धतीचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्न

भविष्यासाठी सर्जनशील आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा.

शासनाचा निर्णय लवकरच जाहीर होणार.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

10 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

10 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

10 तास ago