महाराष्ट्र

दहावी-बारावीची परीक्षा आता वर्षातून दोनदा – शासनाचा निर्णय लवकरच

मुंबई: महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) च्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित शिक्षणव्यवस्थेत मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना आधुनिक, सर्जनशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार आहे.

महत्त्वाचे बदल:

शैक्षणिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून होणार

२०२६-२७ पासून शाळेचे शैक्षणिक वर्ष जूनऐवजी १ एप्रिलला सुरू होणार आहे.

अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल.

परीक्षेच्या पद्धतीतील बदल:

दहावी व बारावीच्या परीक्षा वर्षातून दोन होणार

1) मुख्य परीक्षा (Main Exam)

2) श्रेणी सुधारणा परीक्षा (Improement Exam)

परीक्षांमध्ये घोकंपट्टीऐवजी *रचनात्मक शिक्षणावर भर देण्यात येणार.

अभ्यासक्रम आणि विषय निवडीतील स्वातंत्र्य:

CBSE च्या धर्तीवर अभ्यासक्रम तयार.

विद्यार्थ्यांना आवडीनुसार विषय निवडण्याची मुभा राहणारा आहे.

गणित व विज्ञान यांचे स्वरूप अधिक प्रगत होणार.

अध्यापनातील बदल:

तासिकेची वेळ ४५ मिनिटांऐवजी ५० मिनिटे करण्यात येईल.

शाळांच्या वेळा दोन ✌🏻सत्रांमध्ये विभागल्या जातील.

‘दप्तरमुक्त शाळा’ उपक्रम:

६वी ते ८वीतील विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी १० दिवस *दप्तरमुक्त शाळा* भरवण्यात येणार

कलेच्या विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप व सर्जनशीलतेसाठी प्रोत्साहन दिला जाईल.

टप्प्याटप्प्याने धोरणाची अंमलबजावणी:

२०२५-२६: इयत्ता दुसरीपर्यंत अभ्यासक्रम बदल करण्यात येईल.

२०३०: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पूर्णतः लागू होईल.

बदलांमागील उद्दिष्टे:

विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण.

ताणमुक्त व आनंददायी शिक्षण पद्धतीचा स्वीकार व्हावा यासाठी प्रयत्न

भविष्यासाठी सर्जनशील आणि व्यावसायिक कौशल्यांचा विकास व्हावा.

शासनाचा निर्णय लवकरच जाहीर होणार.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वाघाळे येथे अक्षय तृतीयेनिमित्त कृषी पूजनाने संस्कृतीचा जागर; बैलगाडीची भव्य शोभायात्रा…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वाघाळे येथे १९ तारखेला पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेतून कार्यरत स्वाध्याय…

60 मिनिटे ago

वाघोलीत घडली हृदयद्रावक घटना; उच्चशिक्षित महिलेने संपवलं आयुष्य…

वाघोली : वाघोलीतील 'रविनंदा कॉयलाईट' सोसायटीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. माहेरहून १० लाख रुपये…

1 तास ago

शिरुर; अरणगावच्या निकिताचा संघर्ष यशस्वी; मुंबई लोहमार्ग पोलीस दलात नियुक्ती

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील अरणगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील निकिता संतोष मखर हिने जिद्द,…

24 तास ago

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

2 दिवस ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

2 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

2 दिवस ago