महाराष्ट्र

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतची ११ एकर शासकीय जमीन नवीन कारागृहासाठी सुपूर्द

मुंबई: राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी नवीन कारागृह उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतची सुमारे ११ एकर अतिक्रमणमुक्त शासकीय जमीन मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कुर्ला तालुक्यातील मौजे मानखुर्द येथील या जमिनीचा ताबा मुंबई मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांकडे देण्यात आला.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. ८ एप्रिल २०२६ रोजी एका दिवसात १२०० हून अधिक झोपड्या हटवून सुमारे ११ एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मानखुर्द येथील ही जमीन नवीन कारागृह उभारणीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गृह विभागातील अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) तसेच मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने या जागेची मागणी केली होती.

महसूल विभागाच्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवून ही महत्त्वाची शासकीय जमीन प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आली आहे. राज्यातील वाढती कैद्यांची संख्या आणि विद्यमान कारागृहांवरील ताण लक्षात घेता नवीन कारागृह उभारणीचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

धार्मिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप अयोग्य; हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करा; अस्लम शेख

मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि…

27 मिनिटे ago

दररोज एक लहान आल्याचा तुकडा खाल्ल्याचे फायदे

पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू…

30 मिनिटे ago

आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो

झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप…

37 मिनिटे ago

दीर्घायुष्यासाठी दीर्घ श्‍वसन फायदे तोटे

आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा…

39 मिनिटे ago

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत एल्गार थांबणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश…

43 मिनिटे ago

संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरणात आरोपीला तातडीने अटक करून पीडितेला न्याय द्या; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा…

53 मिनिटे ago