महाराष्ट्र

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतची ११ एकर शासकीय जमीन नवीन कारागृहासाठी सुपूर्द

मुंबई: राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी नवीन कारागृह उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले असून, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतची सुमारे ११ एकर अतिक्रमणमुक्त शासकीय जमीन मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली आहे.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते कुर्ला तालुक्यातील मौजे मानखुर्द येथील या जमिनीचा ताबा मुंबई मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांकडे देण्यात आला.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतच्या शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती. ८ एप्रिल २०२६ रोजी एका दिवसात १२०० हून अधिक झोपड्या हटवून सुमारे ११ एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात प्रशासनाला यश आले.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मानखुर्द येथील ही जमीन नवीन कारागृह उभारणीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार गृह विभागातील अपर मुख्य सचिव (अपील व सुरक्षा) तसेच मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने या जागेची मागणी केली होती.

महसूल विभागाच्या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवून ही महत्त्वाची शासकीय जमीन प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आली आहे. राज्यातील वाढती कैद्यांची संख्या आणि विद्यमान कारागृहांवरील ताण लक्षात घेता नवीन कारागृह उभारणीचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यातील आहार कसा असावा

आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…

1 तास ago

किचनमध्ये काम करताना त्वचेला चटका लागल्यावर टूथपेस्ट लावता

अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…

1 तास ago

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

15 तास ago

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…

15 तास ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

15 तास ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

15 तास ago