महाराष्ट्र

अजितदादांनंतर बारामतीला मिळाले ‘हक्काचे जयदादा’; जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती: जनतेविषयीची आपुलकी, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याची पद्धत आणि त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची कार्यशैली पाहता, अजितदादांनंतर बारामतीकरांना हक्काचे ‘जयदादा’ मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व असलेले Jay Pawar यांनी दर गुरुवारी बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. आज झालेला हा दुसरा जनता दरबार असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आज सकाळी ११ वाजल्यापासून राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबारास सुरुवात झाली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. जनता दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी जय पवार यांनी संबंधितांशी संपर्क साधत सकारात्मक प्रतिसाद दिला.

नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. बारामतीकरांमधून “अजितदादांनंतर आपल्याला सहज उपलब्ध, जनसामान्यांशी जोडलेले आणि हक्काचे युवा नेतृत्व मिळाले,” अशी भावना व्यक्त करण्यात येत होती.जय अजितदादा पवार यांच्या या उपक्रमामुळे नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पावसाळ्यातील आहार कसा असावा

आयुर्वेदानुसार विसर्ग काळात म्हणजे सुर्याचे दक्षिणायन सुरु झाल्यावर म्हणजेच पावसाळ्यात शरीरात वात दोष शरीरात बळावतो…

1 तास ago

किचनमध्ये काम करताना त्वचेला चटका लागल्यावर टूथपेस्ट लावता

अनेकदा किचनमध्ये काम करत असताना, स्वयंपाक करत असताना गरम भांड्यांना हात लावल्यावर किंवा चपात्या भाजताना…

1 तास ago

उत्तर भारतीय समाजाचा काँग्रेसला पाठिंबा; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

मुंबई: उत्तर भारतीय बिहारी फ्रंटचे नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

15 तास ago

बीडच्या सर्वांगीण विकासासाठी शासन खंबीर; विकासाच्या प्रवासात बीडकरांनी साथ द्यावी; सुनेत्रा पवार

बीड: राज्य सरकार शिक्षणासह आरोग्याला प्राधान्य देत असून ‘सुदृढ, सुशिक्षित, समृद्ध आणि सुरक्षित बीड’ घडवण्याचा…

15 तास ago

संघाने संविधान स्वीकारावे, देणगीचा हिशोब देशाला द्यावा; हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुंबई : स्वातंत्र्य चळवळीत काडीचाही सहभाग नसलेल्या शक्ती आज देशात आणि राज्यात सत्तेवर आहेत. या…

15 तास ago

झोपेतून उठत रात्री पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागतं? सावध व्हा, ‘या’ आजारांचा असू शकतो इशारा

अनेकांना रात्री पुन्हा पुन्हा तहान लागते आणि त्यासाठी त्यांना झोपेतून उठावं लागतं. अनेकदा पाणी पिण्याच्या…

15 तास ago