महाराष्ट्र

अजितदादांनंतर बारामतीला मिळाले ‘हक्काचे जयदादा’; जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती: जनतेविषयीची आपुलकी, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याची पद्धत आणि त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची कार्यशैली पाहता, अजितदादांनंतर बारामतीकरांना हक्काचे ‘जयदादा’ मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व असलेले Jay Pawar यांनी दर गुरुवारी बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. आज झालेला हा दुसरा जनता दरबार असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आज सकाळी ११ वाजल्यापासून राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबारास सुरुवात झाली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. जनता दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी जय पवार यांनी संबंधितांशी संपर्क साधत सकारात्मक प्रतिसाद दिला.

नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. बारामतीकरांमधून “अजितदादांनंतर आपल्याला सहज उपलब्ध, जनसामान्यांशी जोडलेले आणि हक्काचे युवा नेतृत्व मिळाले,” अशी भावना व्यक्त करण्यात येत होती.जय अजितदादा पवार यांच्या या उपक्रमामुळे नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोकणातील आंबा-काजू उत्पादकांना मदत द्या; शेतकरी आंदोलन दडपल्याचा काँग्रेसचा आरोप

मुंबई: Harshvardhan Sapkal यांनी कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी…

59 मिनिटे ago

१ जुलैपासून वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP ) बसविणे अनिवार्य; प्रताप सरनाईक

मुंबई: राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या…

1 तास ago

महसूल विभागाच्या निर्णयांमुळे नागरिकांना मोठा दिलासा; चंद्रशेखर बावनकुळे

‘महाराजस्व समाधान शिबीर’ लोकाभिमुख उपक्रम मुंबई: चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य शासन लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक…

1 तास ago

२० मेपासून पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरू; तंत्र शिक्षण संचालनालयाचे कालबद्ध नियोजन

मुंबई:  दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७…

1 तास ago

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडलगतची ११ एकर शासकीय जमीन नवीन कारागृहासाठी सुपूर्द

मुंबई: राज्यातील कारागृहांवरील वाढता ताण कमी करण्यासाठी नवीन कारागृह उभारणीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले…

1 तास ago

मंत्रालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

मुंबई: छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज…

9 तास ago