महाराष्ट्र

अजितदादांनंतर बारामतीला मिळाले ‘हक्काचे जयदादा’; जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती: जनतेविषयीची आपुलकी, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याची पद्धत आणि त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची कार्यशैली पाहता, अजितदादांनंतर बारामतीकरांना हक्काचे ‘जयदादा’ मिळाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व असलेले Jay Pawar यांनी दर गुरुवारी बारामती येथील राष्ट्रवादी भवनात जनता दरबार घेण्याची घोषणा केली होती. आज झालेला हा दुसरा जनता दरबार असून त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

आज सकाळी ११ वाजल्यापासून राष्ट्रवादी भवन येथे जनता दरबारास सुरुवात झाली. यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत विविध समस्या आणि मागण्या मांडल्या. जनता दरबारात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी जय पवार यांनी संबंधितांशी संपर्क साधत सकारात्मक प्रतिसाद दिला.

नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. बारामतीकरांमधून “अजितदादांनंतर आपल्याला सहज उपलब्ध, जनसामान्यांशी जोडलेले आणि हक्काचे युवा नेतृत्व मिळाले,” अशी भावना व्यक्त करण्यात येत होती.जय अजितदादा पवार यांच्या या उपक्रमामुळे नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

धार्मिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप अयोग्य; हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करा; अस्लम शेख

मुंबई: नांदेड येथील तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा बोर्डाची तातडीने पुनर्स्थापना करावी आणि…

2 तास ago

दररोज एक लहान आल्याचा तुकडा खाल्ल्याचे फायदे

पचन सुधारते आलं पाचक रस वाढवतं, गॅस व अपचन कमी करतं दाहशामक (Anti-inflammatory) सांधेदुखी, स्नायू…

2 तास ago

आठवड्याभराची अपुरी झोप वीकेंडला घेतल्याने हृदय विकाराचा धोका कमी होऊ शकतो

झोप ही प्रत्येकालाच आवडते आणि प्रत्येकाची झोपण्याची शैली वेगवेगळी असते. आजकालच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप…

2 तास ago

दीर्घायुष्यासाठी दीर्घ श्‍वसन फायदे तोटे

आपण अस्वस्थ होतो तेव्हा नेहमी शांत राहण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय जेव्हा जखम होते तेव्हा…

2 तास ago

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत एल्गार थांबणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

छत्रपती संभाजीनगर: शेतकऱ्यांना विनाअट सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आयोजित 'एल्गार अन्नदात्याचा' आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश…

2 तास ago

संगमनेर अॅसिड हल्ला प्रकरणात आरोपीला तातडीने अटक करून पीडितेला न्याय द्या; आमदार सत्यजीत तांबे

मुंबई: संगमनेर येथे १२ वर्षीय मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ला प्रकरणात ९० दिवसांहून अधिक कालावधी उलटूनही आरोपीचा…

2 तास ago