महाराष्ट्र

वांद्रा अतिक्रमण प्रकरणात १५ जण अटकेत; भूमाफिया आणि भ्रष्ट साखळीवर कारवाईची मागणी जोरात

मुंबई : वांद्रा रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर केवळ दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. अतिक्रमणाच्या मागे कार्यरत असलेल्या भूमाफिया, भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय संरक्षण देणाऱ्या साखळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, रेल्वे, पालिका आणि इतर सरकारी जमिनींवर संगनमताने अतिक्रमणे उभी राहतात. त्यानंतर अनधिकृत झोपड्या व चाळी बांधून लाखो रुपयांचे व्यवहार केले जातात. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने वीज, पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

राजकीय संरक्षणामुळे अशा अवैध बांधकामांवर वेळेवर कारवाई होत नसल्याची टीकाही केली जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्ट्यांचा ‘व्होट बँक’ म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात केवळ दंगलीत सहभागी व्यक्तींवर नव्हे, तर संपूर्ण अवैध साखळीवर चौकशी करून मुख्य सूत्रधारांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई ते सुरजागड! विकासाच्या महामार्गावर महाराष्ट्र; १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; एकनाथ शिंदे

मुंबई: “विकसित भारत २०४७”च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत…

4 तास ago

वोटचोरी करून भाजप सत्तेत; लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागेल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असून बिहार…

4 तास ago

शिरुर तालुक्यातील निखिल इचके मृत्यू प्रकरणात “अपघात की घातपात…?”

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील युवक निखिल संदीप इचके यांच्या संशयास्पद मृत्यू…

4 तास ago

‘कॉकरोच जनता पार्टी’ ते संविधानप्रेम; बदलले फक्त शब्द नव्हे, भूमिकाही!

मुंबई : सार्वजनिक जीवनात काही घटना अशा घडतात की त्यांची नोंद इतिहासापेक्षा विनोदाच्या पुस्तकात व्हावी…

4 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक…

4 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये विजेच्या धक्क्याची गंभीर घटना; ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे कामगाराचा जीव धोक्यात…?

कारेगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीच्या विद्युत दुरुस्तीच्या कामादरम्यान मोठी…

8 तास ago