महाराष्ट्र

वांद्रा अतिक्रमण प्रकरणात १५ जण अटकेत; भूमाफिया आणि भ्रष्ट साखळीवर कारवाईची मागणी जोरात

मुंबई : वांद्रा रेल्वे स्टेशनजवळील गरीब नगर परिसरात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून सुमारे १५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर केवळ दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नसल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. अतिक्रमणाच्या मागे कार्यरत असलेल्या भूमाफिया, भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय संरक्षण देणाऱ्या साखळीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, रेल्वे, पालिका आणि इतर सरकारी जमिनींवर संगनमताने अतिक्रमणे उभी राहतात. त्यानंतर अनधिकृत झोपड्या व चाळी बांधून लाखो रुपयांचे व्यवहार केले जातात. काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या मदतीने वीज, पाणी आणि इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

राजकीय संरक्षणामुळे अशा अवैध बांधकामांवर वेळेवर कारवाई होत नसल्याची टीकाही केली जात आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्ट्यांचा ‘व्होट बँक’ म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणात केवळ दंगलीत सहभागी व्यक्तींवर नव्हे, तर संपूर्ण अवैध साखळीवर चौकशी करून मुख्य सूत्रधारांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेला उधाण; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन, सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…

8 तास ago

उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही?

उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…

8 तास ago

दिवसभरात आपण किती वेळा श्वास घेतो

२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…

9 तास ago

किडनी स्टोन समस्या आणि काळजी

किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…

9 तास ago

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…

9 तास ago

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…

9 तास ago