पुणे: राज्यात गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक कारणे, रस्ते अपघात, विहिरीत पडणे, विजेचा धक्का तसेच शिकारीमुळे तब्बल ६७५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मृत्यूंपैकी सर्वाधिक १८१ बिबट्यांचे मृत्यू पुणे वन विभागात झाले असून नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
वन विभागाकडून विविध उपाययोजना राबवूनही बिबट्यांचे मृत्यू तसेच बिबट्यांमुळे होणारी मनुष्यहानी कमी करण्यात अपेक्षित यश मिळालेले नाही. याच कालावधीत राज्यात १८७ वाघांचाही विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी वन विभागाकडे केलेल्या अर्जातून ही माहिती उघड झाली. बिबट्यांची संख्या वाढल्याचे कारण देत वन विभागाने जुन्नर परिसरातील ५० बिबटे गुजरातमधील ‘वनतारा’ या वन्यजीव संस्थेकडे हलवले होते.
बिबट्यांसाठी वाढते धोके
मुक्तपणे फिरणारे बिबटे मनुष्यांसाठी तसेच स्वतःसाठीही धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर रस्ता ओलांडताना वाहनांच्या धडकेत पुणे विभागातच ५० पेक्षा जास्त बिबटे मृत्यूमुखी पडले आहेत.
जंगलांना जोडणारे वनपट्टे कमी होत चालल्यामुळे बिबट्यांना अन्न, पाणी किंवा नवीन अधिवासाच्या शोधात रस्ते ओलांडावे लागतात. तसेच ३० पेक्षा जास्त बिबटे उघड्या विहिरींमध्ये पडून मृत्यूमुखी पडल्याचेही नोंद आहे. शेतातील कुंपणासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेच्या ताराही बिबट्यांसाठी प्राणघातक ठरत आहेत.
२०२५ हे संघर्षाचे वर्ष
ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात मानवी हल्ल्यांत पाच जणांचा मृत्यू
संघर्ष रोखण्यासाठी ६८ बिबट्यांना पकडण्यात आले
माणिकडोह बचाव केंद्र भरल्यामुळे ५० बिबटे गुजरातमधील ‘वनतारा’ प्रकल्पात हलवले
बिबट्यांच्या मृत्यूची प्रमुख कारणे
गाव आणि उपनगरांपर्यंत वाढलेले रस्त्यांचे जाळे
डांबरी रस्त्यांमुळे वाहनांचा वाढलेला वेग
रात्री प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या
वन्यप्राण्यांच्या हालचालींवर वाढलेले निर्बंध
शेतातील उघड्या विहिरींमध्ये पडून होणारे मृत्यू
राज्यातील बिबट्यांचे वर्षनिहाय मृत्यू
२०२१ – १६७
२०२२ – १४०
२०२३ – ७७
२०२४ – १४४
२०२५ – १३७
२०२६ – १० (जानेवारी अखेरपर्यंत)
मृत्यूंचे कारणानुसार चित्र
नैसर्गिक कारणे – ३२०
रस्ते अपघात व इतर अपघात – १९८
शिकारी – १७
विजेचा धक्का – १२
पाच वर्षांत नाशिक विभागात १६१ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. एकूणच पाहता राज्यात वाघांच्या तुलनेत बिबट्यांच्या मृत्यूचे प्रमाण तिपटीहून अधिक असल्याचे दिसून येते.
जुन्नर वन विभागाच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस म्हणाल्या की, जंगलांचे तुकडे होणे आणि वनपट्टे कमी होणे यामुळे वन्यप्राण्यांच्या हालचालींवर मर्यादा येत आहेत. अन्न-पाणी किंवा नवीन अधिवासाच्या शोधात त्यांना रस्ते ओलांडावे लागते. वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी यासाठी अनेक ठिकाणी फलक लावले असले तरी वेगामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…