महाराष्ट्र

पत्रकार कल्याण महामंडळाचा घोळ; मंजूर निर्णय कुठे गायब?

‘आर्थिक विकास महामंडळ’ की पत्रकारांचा प्रश्न भरकटवण्याचा प्रयत्न?

मुंबई: महाराष्ट्रात पत्रकारांसाठी स्वतंत्र पत्रकार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचा दावा असतानाही प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे हा निर्णय नेमका कुठे आणि कसा अडकला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पत्रकार आणि माध्यमकर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या शीतल हरीष करदेकर यांनी जुलै २०२४ मध्ये मुंबईतील आझाद मैदानावर दोन दिवस आमरण उपोषण करत पत्रकार कल्याण महामंडळाची मागणी केली होती. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार महामंडळ स्थापन करण्याचे आश्वासन दिले आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिल्याचे सांगण्यात आले.

मात्र त्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी कुठेही दिसत नसल्याचा आरोप होत आहे. कामगार विभाग, माहिती व जनसंपर्क विभाग आणि अर्थ विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने हा विषय रखडल्याचेही बोलले जात आहे.याच पार्श्वभूमीवर विधान परिषदेत पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. मंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने उत्तर देताना ऑक्टोबर २०२४ मध्ये दोन महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आणि पुढील अधिवेशनापर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

मात्र पत्रकार संघटनांच्या मते मूळ मागणी पत्रकार कल्याणकारी महामंडळाची होती. त्याऐवजी आर्थिक विकास महामंडळाचा मुद्दा पुढे करून मूळ प्रश्न भरकटवला जात असल्याची टीका होत आहे.पत्रकारांचे म्हणणे आहे की, राज्यातील पत्रकार व माध्यमकर्मी यांची अधिकृत नोंदणी, सामाजिक सुरक्षा, कायदेशीर संरक्षण आणि सन्मान मिळण्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ आवश्यक आहे. अन्यथा पत्रकारांना विविध विभागांकडे भटकंती करावी लागते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

5 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

5 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

7 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago