शाळा प्रशासनावर गंभीर आरोप
बदलापूर: बदलापूरमध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बदलापूर पश्चिमेकडील एका नामांकित खासगी शाळेच्या बसमध्ये अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बसमध्येच घडला घृणास्पद प्रकार
पीडित मुलगी नर्सरीत शिक्षण घेत असून रोज शाळेच्या बसने प्रवास करत होती. याच प्रवासादरम्यान बस चालकाने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपासून मुलीच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आल्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेतले असता हा प्रकार उघड झाला.
तक्रारीनंतरही शाळेची उदासीन भूमिका
पालकांनी तातडीने शाळा प्रशासनाकडे तक्रार केली असता, मदत करण्याऐवजी मुख्याध्यापिकेने चक्क बस चालकाची पाठराखण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळा प्रशासनाने या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
ड्रायव्हर पाहताच चिमुरडी घाबरली
मुख्याध्यापिकेकडून दाद न मिळाल्याने पालकांनी शाळेतच बस चालकाला बोलावले. चालक समोर येताच ती 4 वर्षांची चिमुरडी प्रचंड घाबरली आणि पालकांच्या मागे लपली. हा प्रसंग पाहून पालकांना तिच्यासोबत गंभीर अन्याय झाल्याची खात्री पटली.यानंतर पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी बस चालकाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
नियमांची पायमल्ली: बसमध्ये महिला अटेंडंट नाही
या घटनेमुळे राज्य सरकारच्या स्कूल बस नियमावलीचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमानुसार स्कूल बसमध्ये महिला अटेंडंट असणे बंधनकारक असताना, संबंधित बसमध्ये कोणतीही महिला कर्मचारी नव्हती. शाळेच्या या हलगर्जीपणामुळेच आरोपी चालकाला मोकळे रान मिळाल्याचे बोलले जात आहे.
गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया
दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले,मानसिक विकृतीतून अतिशय निंदनीय अशी घटना बदलापूर येथे घडली आहे. स्कूल वाहनचालकाने शाळकरी मुलीवर चुकीचे कृत्य केल्याचे निदर्शनास आले असून, पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. शाळा प्रशासनाला याआधीच शालेय शिक्षण विभागामार्फत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…