महाराष्ट्र

शेतकऱ्याचा मुलगा बनला फौजदार…

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पोलिस खात्यांतर्गत घेतलेल्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत नायगाव (ता. हवेली) येथील शेतकरी कुटुंबातील प्रवीण शिवाजी कांचन यांनी बाजी मारली आहे. शेतकऱ्याचा मुलगा फौजदार बनल्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रवीण कांचन यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव येथे झाले. त्यानंतर पुढील माध्यमिक शिक्षण कुंजीरवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयातून तर उच्च माध्यमिक शिक्षण लोणी काळभोर येथील समाजभूषण गणपतराव काळभोर महाविद्यालयातून पूर्ण केले. प्रवीण कांचन हे २०१४ साली महाराष्ट्र पोलिस भरती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ते सध्या विमानगर पोलिस ठाण्यात पोलिस अंमलदार या पदावर कार्यरत आहेत.

यशासाठी कांचन यांना विमानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुरलीधर करपे, पोलिस निरीक्षक भरत जाधव व मुंबई येथील पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले आहे.

दरम्यान, प्रवीण कांचन हे अवघ्या ५ वर्षाचे असतानाच, त्यांचे वडील शिवाजीराव कांचन यांचे निधन झाले होते. त्यानंतर प्रवीणची आई जनाबाई यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळली आणि शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. प्रवीण यांनी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर ही जिद्दीने प्रयत्न करून यशाला गवसणी घातली. प्रवीण कांचन म्हणाले, ‘जिद्द, चिकाटी, मेहनत आणि अभ्यास करायची तयारी असेल तर यश निश्चित मिळते. ध्येय नक्कीच गाठता येते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अपयशाला खचून न जाता त्याला प्रयत्नांच्या परिकाष्टाची जोड दिल्यास यशाचे शिखर गाठता येते. आईमुळे यश मिळाले आहे.’

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

3 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

3 तास ago

पश्चिम बंगाल, आसाम निकालांवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पश्चिम बंगाल व आसाम विधानसभा…

3 तास ago

महाराष्ट्र हादरला! ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने संताप

मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…

8 तास ago

बारामती पोटनिवडणूक निकाल! ‘हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…

8 तास ago

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…

8 तास ago