महाराष्ट्र

अजित पवारांच्या अंत्यस्थळावरच भव्य स्मारक; शरद पवार भावुक, विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाची पाहणी

बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. बारामती एमआयडीसी येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या अंत्यसंस्कारावेळी लाखोंचा जनसागर उसळला होता.

विद्या प्रतिष्ठानच्या भव्य शैक्षणिक संकुलाच्या उभारणीत अजित पवार यांचे मोठे योगदान होते. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून हे संपूर्ण संकुल पूर्ण करून घेतले होते. त्यामुळे या परिसराशी त्यांची भावना आणि नाळ घट्ट जोडलेली होती.

अजित पवार यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का बसला. अपघाताच्या दिवशीच सायंकाळी प्रतिक्रिया देताना शरद पवार अत्यंत भावुक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता आणि शब्द फुटेनासे झाले होते. त्या दिवसापासून शरद पवार बारामतीतच थांबले होते.

आज मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी शरद पवार यांनी थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाला भेट दिली. अजित पवार यांच्या अंत्यस्थळाकडे पाहताच ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवार यांच्या स्मारकाबाबत सविस्तर चर्चा केली.

किरण गुजर यांनी सांगितले की, ज्या विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलासाठी अजित दादांनी दिवस-रात्र एक करून काम केले, त्याच मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याच आठवणी जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा ठसा कायम ठेवण्यासाठी याच ठिकाणी अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारक ज्या जागेवर उभारले जाणार आहे, त्या ठिकाणी शरद पवार यांनी पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र येणाऱ्या काळात स्मारकाच्या रूपाने अजित पवार हे बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्राच्या स्मरणात सदैव जिवंत राहणार आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

3 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

4 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

8 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

8 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

8 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

8 तास ago