बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. बारामती एमआयडीसी येथील विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या अंत्यसंस्कारावेळी लाखोंचा जनसागर उसळला होता.
विद्या प्रतिष्ठानच्या भव्य शैक्षणिक संकुलाच्या उभारणीत अजित पवार यांचे मोठे योगदान होते. या इमारतीचे बांधकाम सुरू असताना अजित पवार यांनी स्वतः लक्ष घालून हे संपूर्ण संकुल पूर्ण करून घेतले होते. त्यामुळे या परिसराशी त्यांची भावना आणि नाळ घट्ट जोडलेली होती.
अजित पवार यांच्या निधनानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मोठा धक्का बसला. अपघाताच्या दिवशीच सायंकाळी प्रतिक्रिया देताना शरद पवार अत्यंत भावुक झाले होते. त्यांचा कंठ दाटून आला होता आणि शब्द फुटेनासे झाले होते. त्या दिवसापासून शरद पवार बारामतीतच थांबले होते.
आज मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी शरद पवार यांनी थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानाला भेट दिली. अजित पवार यांच्या अंत्यस्थळाकडे पाहताच ते भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी विद्याप्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्याशी अजित पवार यांच्या स्मारकाबाबत सविस्तर चर्चा केली.
किरण गुजर यांनी सांगितले की, ज्या विद्या प्रतिष्ठानच्या शैक्षणिक संकुलासाठी अजित दादांनी दिवस-रात्र एक करून काम केले, त्याच मैदानावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याच आठवणी जपण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा ठसा कायम ठेवण्यासाठी याच ठिकाणी अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारक ज्या जागेवर उभारले जाणार आहे, त्या ठिकाणी शरद पवार यांनी पाहणी करून संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे बारामतीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मात्र येणाऱ्या काळात स्मारकाच्या रूपाने अजित पवार हे बारामतीकरांच्या आणि महाराष्ट्राच्या स्मरणात सदैव जिवंत राहणार आहेत.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…
कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…
मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…
मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…
बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…
मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…