महाराष्ट्र

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरला! भाजप मंत्री पीयूष गोयल यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे असलेली बहुतांश खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असली, तरी वित्त आणि नियोजन विभागाचे महत्त्वाचे खाते अद्याप देण्यात आलेले नाही.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले आहे. पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवारांकडे जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

ही माहिती भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे. त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचा दावा केला आहे. गोयल यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

पीयूष गोयल काय म्हणाले?

पीयूष गोयल म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आधी अजित पवारांकडे होते आणि आता सुनेत्रा पवारांकडे आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांना राष्ट्रवादीत सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाईल, असे मला वाटत नाही, कारण त्यांनी जनतेचा विश्वास आणि मते गमावली आहेत.”

गोयल यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली असून, पक्षाकडून यावर अधिकृत भूमिका काय घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिंदोडी (तेजस फडके) शिंदोडी, ता. शिंदोडी येथील घोड धरणाच्या पात्रातुन शेतीच्या नावाखाली काळ्या मातीचा उपसा…

1 तास ago

शिरुर; शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सराईत आरोपींच्या पोलिसांनी दोन तासांत आवळल्या मुसक्या

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथे घोडनदीच्या पात्रातील पाण्याच्या बांधावरुन झालेल्या वादाचे रुपांतर थेट…

2 तास ago

शालेय शिक्षण विभागाचा गुगलसोबत करार; राज्यातील ४ लाख शिक्षकांना एआय प्रशिक्षणाचा लाभ

मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…

5 तास ago

पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…

5 तास ago

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…

5 तास ago

नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द; ‘उत्तर महाराष्ट्राच्या विकासावर घाला’ – सत्यजीत तांबे

नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची…

5 तास ago