मुंबई: बारामतीतील अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर आज त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. शपथविधी अत्यंत साध्या पद्धतीने पार पडली, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते.
सुनेत्रा पवार यांना राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास या तीन खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अजित पवारांकडे असलेली नियोजन आणि वित्त ही खाती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीसाठी प्रस्थान केले. त्यांनी मुंबईतून निघण्यापूर्वी काटेवाडी येथील अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार यांची भेट घेतली. भेटीबद्दल त्यांनी सांगितले की, “उद्या बजेट सेशन आहे, त्यामुळे मी आशाकाकींना भेटायला गेले. आशाकाकींची परवानगी घेतली आणि आज मी दिल्लीसाठी निघालो.”
मुंबईतील सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत आणि शरद पवार यांची उपस्थिती नसल्याबाबत प्रश्न विचारल्यावर सुप्रिया सुळे यांनी हात जोडून फक्त “राम कृष्ण हरी” अशी प्रतिक्रिया दिली.या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात झाली असून, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आगामी काळात राज्यातील राजकारणात कसा प्रभाव टाकतो, हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.
शिरुर (तेजस फडके): न्हावरे (ता. शिरुर) येथील शेंडगेवस्ती परिसरात एका २३ वर्षीय विवाहित महिलेला फोनवर…
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…