महाराष्ट्र

गुढीपाडव्याच्या जल्लोषात विकासाची गुढी उभारण्याचा संकल्प; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे: गुढीपाडव्याच्या मंगलमय निमित्ताने ठाणे शहरात पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात समृद्धी, स्थैर्य आणि प्रगतीची गुढी उभारण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन केले.

कोपिनेश्वर मंदिर नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेत ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लयीत आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घराघरांवर उभारलेल्या गुढ्या, फुलांचा सुगंध आणि उत्साहाने भारलेले वातावरण यामुळे संपूर्ण शहरात सणाचा जल्लोष अनुभवायला मिळाला.

शोभायात्रेतील विविध सामाजिक संस्था, शाळा, बँका आणि सांस्कृतिक मंडळांनी सादर केलेले चित्ररथ हे प्रमुख आकर्षण ठरले. पर्यावरण संवर्धन, अवयवदान, आयुर्वेद, संतुलित आहार आणि मानसिक आरोग्य यांसारख्या विषयांवर प्रभावी संदेश देत या चित्ररथांनी समाजप्रबोधन साधले. लहानग्यांच्या मल्लखांब आणि कसरतींच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळवली.

या प्रसंगी बोलताना शिंदे म्हणाले, “शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनी यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करून त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेणे हा शासनाचा निर्धार आहे. सामान्य नागरिकांच्या स्वप्नांना बळ देत त्यांच्या आयुष्यात समृद्धीची नवी पहाट उगवावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”

ठाण्यातील गुढीपाडव्याची ही शोभायात्रा स्वर्गीय आनंद दिघे यांच्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करणारी परंपरा असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाने ठाणेकरांमध्ये ऐक्य, अभिमान आणि सकारात्मकतेची भावना अधिक दृढ केली.

दरम्यान, टेंभी नाका येथील आनंद आश्रमातही गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. येथे शिंदे यांच्या हस्ते गुढी पूजन करण्यात आले तसेच स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभ राव तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

20 मिनिटे ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

24 मिनिटे ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

29 मिनिटे ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

36 मिनिटे ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

11 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

15 तास ago