ठाणे: गुढीपाडव्याच्या मंगलमय निमित्ताने ठाणे शहरात पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. या वेळी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाच्या जीवनात समृद्धी, स्थैर्य आणि प्रगतीची गुढी उभारण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन केले.
कोपिनेश्वर मंदिर नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शोभायात्रेत ढोल-ताशांच्या गजरात, भगव्या पताकांच्या लयीत आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेले नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घराघरांवर उभारलेल्या गुढ्या, फुलांचा सुगंध आणि उत्साहाने भारलेले वातावरण यामुळे संपूर्ण शहरात सणाचा जल्लोष अनुभवायला मिळाला.
शोभायात्रेतील विविध सामाजिक संस्था, शाळा, बँका आणि सांस्कृतिक मंडळांनी सादर केलेले चित्ररथ हे प्रमुख आकर्षण ठरले. पर्यावरण संवर्धन, अवयवदान, आयुर्वेद, संतुलित आहार आणि मानसिक आरोग्य यांसारख्या विषयांवर प्रभावी संदेश देत या चित्ररथांनी समाजप्रबोधन साधले. लहानग्यांच्या मल्लखांब आणि कसरतींच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची दाद मिळवली.
या प्रसंगी बोलताना शिंदे म्हणाले, “शेतकरी, कष्टकरी, तरुण आणि माता-भगिनी यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करून त्यांना प्रगतीच्या मार्गावर नेणे हा शासनाचा निर्धार आहे. सामान्य नागरिकांच्या स्वप्नांना बळ देत त्यांच्या आयुष्यात समृद्धीची नवी पहाट उगवावी, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”
ठाण्यातील गुढीपाडव्याची ही शोभायात्रा स्वर्गीय आनंद दिघे यांच्या सांस्कृतिक वारशाची जपणूक करणारी परंपरा असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उत्सवाने ठाणेकरांमध्ये ऐक्य, अभिमान आणि सकारात्मकतेची भावना अधिक दृढ केली.
दरम्यान, टेंभी नाका येथील आनंद आश्रमातही गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला. येथे शिंदे यांच्या हस्ते गुढी पूजन करण्यात आले तसेच स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, आयुक्त सौरभ राव तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…