महाराष्ट्र

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात 30 जुलै रोजी वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हे अभियान केवळ उद्घाटनापुरते मर्यादित नसून, वर्षभर चालणारी व्यापक जनजागृती मोहीम असेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भातील आढावा बैठकीत मंत्री लोढा यांनी समाजातील सर्व घटक, विशेषतः विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी या जनचळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. बैठकीला उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल (ऑनलाइन), महापालिका, शिक्षण विभाग आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, ऑनलाइन आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून लाखो नागरिकांना व्यसनमुक्तीची सामूहिक शपथ दिली जाणार आहे.

राज्यभरातील प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात विद्यार्थी सुरक्षा समितीच्या माध्यमातून वर्षभर व्यसनमुक्तीविषयक विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सातवीपासून पुढील विद्यार्थ्यांसह महाविद्यालये, आयटीआय, शिक्षक आणि पालकांचा या मोहिमेत सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे. तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनाही अभियानात सहभागी करून घेतले जाणार आहे.

वरळी डोम येथील मुख्य कार्यक्रमाचे मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून, ‘नशामुक्त मुंबई’ ही लोकचळवळ बनविण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

1 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

1 तास ago

कारगिल विजय दिनानिमित्त वीरसैनिक, वीरपत्नी व वीरमातांचा कृतज्ञता सन्मान; सरकार सदैव सोबत; सुनेत्रा पवार

मुंबई: कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कृतज्ञता सन्मान सोहळ्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी राज्य सरकार…

1 तास ago

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून; मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, शिक्रापूर पोलिसांनी काही तासांत उकलले गूढ

अनैतिक संबंधाच्या संशयातून रूममेटने गळा दाबून केली हत्या; पत्नीसह अटक शिक्रापूर (ओमकार भोरडे): शिक्रापूर येथील…

12 तास ago

हेडऐवजी टेलपासून कालव्याचे अस्तरीकरण; शिरूरच्या शेतकऱ्यांवर अन्यायाचा आरोप, आंदोलनाचा इशारा

आंबळे ग्रामस्थांचा चासकमान पाटबंधारे विभागाला इशारा; हेडपासून काम सुरू न केल्यास तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा निर्धार…

16 तास ago

उबाठा गटाला मोठा धक्का! अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…

22 तास ago