महाराष्ट्र

अभ्यासाच्या बहाण्याने बाहेर पडलेल्या दहावीतील तिन्ही मुलींचा थरारक शोध

१० तासांनी पेरूच्या बागेत सुखरूप सापडल्या

नाशिक: नाशिकरोड परिसरात मंगळवारी दुपारी अभ्यासासाठी घराबाहेर पडलेल्या दहावीतील तीन अल्पवयीन मुली संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने एकच खळबळ उडाली. पालक आणि नातेवाईकांनी परिसरात शोधाशोध केली; मात्र मुलींचा पत्ता न लागल्याने अखेर नाशिकरोड पोलीस ठाणे येथे बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून सुमारे दहा तासांनंतर चेहेडी पंपिंग स्टेशन परिसरातील एका पेरूच्या बागेत तिन्ही मुलींना भेदरलेल्या अवस्थेत सुखरूप शोधून काढले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मालधक्का परिसरात राहणाऱ्या या तिन्ही मुली सध्या दहावीत शिक्षण घेत आहेत. त्यापैकी दोन मुली सख्ख्या बहिणी असून त्या आपल्या मैत्रिणीकडे अभ्यासासाठी ये-जा करतात. मंगळवारी दुपारी साडे दोनच्या सुमारास दोन्ही बहिणी मैत्रिणीच्या घरी अभ्यासासाठी गेल्या होत्या. घरासमोरील शेतात तिघी जणी अभ्यास करत बसल्या असताना मैत्रिणीची आई देखील जवळच काम करत होती.

साडे तीनच्या सुमारास आई पाणी भरण्यासाठी घरात गेल्याची संधी साधून तिघींनी तेथून निघ काढला. बाहेर पडताना त्यांनी “झेरॉक्स काढायला जातो” असे सांगितले होते. प्रत्यक्षात त्या एका मित्राला भेटण्यासाठी गेल्याची माहिती पुढे समोर आली.

संध्याकाळपर्यंत परत न आल्याने धावपळ

सायंकाळ झाली तरी मुली घरी न आल्याने पालकांची चिंता वाढली. त्यांनी इतर मैत्रिणींच्या घरी चौकशी केली. रेल्वे स्थानक, बसस्थानक तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला; मात्र मुलींचा काहीच मागमूस लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांना माहिती दिली.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. पहाटे चार वाजता एका मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून तिघी मुली बेपत्ता झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली.

रात्रभर सुरू होती शोधमोहीम

पोलिसांनी चेहेडी पंपिंग स्टेशन परिसरात तसेच आसपासच्या भागात कसून शोध घेतला. अखेर बुधवारी सकाळी चेहेडी परिसरातील एका पेरूच्या बागेत तिन्ही मुली घाबरलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले व पुढे पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

भीतीपोटी रात्रभर बागेतच ठाण मांडून

पोलिसांनी विचारणा केली असता, घरी परतायला उशीर झाल्याने घरचे रागावतील या भीतीने आपण घरी न जाता पेरूच्या बागेतच थांबलो, अशी कबुली मुलींनी दिली. किर्र अंधारात आणि निर्जन ठिकाणी त्यांनी रात्र काढल्याचे समजताच पालकांसह पोलिसांनीही डोक्यावर हात मारला.

सुदैवाने या तिन्ही मुली सुरक्षित सापडल्या असून त्यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे पालकांनी मुलांशी संवाद वाढवण्याची आणि त्यांच्या हालचालींकडे अधिक लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

10 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

14 तास ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

15 तास ago

सोनम वांगचूक यांच्या अटकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादी आक्रमक

मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा मुंबई: दिल्लीतील…

15 तास ago

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची…

16 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या निधनाने गांधी विचाराचा सच्चा पाईक हरपला; हर्षवर्धन सपकाळ यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, गांधीवादी नेते आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या…

16 तास ago