महाराष्ट्र

वैध कारणांशिवाय सासर सोडणाऱ्या पत्नीला पोटगीचा हक्क मिळणार नाही

बिलासपूर: वैध आणि पुरेसे कारण नसताना पती व सासरच्या मंडळींपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलेला पोटगी (Alimony) मिळण्याचा हक्क नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. बिलासपूर येथील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवत उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

हा निर्णय 27 जानेवारी रोजी बिलासपूर येथील एका रहिवाशाच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर देण्यात आला. या याचिकेत तिने कौटुंबिक न्यायालयाने पोटगी नाकारल्याच्या आदेशाला आव्हान दिले होते.

मुख्य न्यायाधीश रमेश सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले की, कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशात कोणताही कायदेशीर दोष किंवा बेकायदेशीरपणा आढळून येत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप करण्याची गरज नाही.

न्यायालयाने पुढे नमूद केले की, पतीने वैवाहिक हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी याचिका दाखल केली असताना पत्नीला पुन्हा सासरी जाऊन वैवाहिक जीवन सुरू करण्याची संधी होती. मात्र तिने ती संधी नाकारली. अशा परिस्थितीत पत्नी पोटगीचा दावा करू शकत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले.

दरम्यान, संबंधित महिलेने पती आणि सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप केला होता. लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत गाडी व 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा तसेच शारीरिक, मानसिक व शाब्दिक छळ झाल्याचा दावा तिने केला होता. मात्र, न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि परिस्थितीचा विचार करता पोटगी देण्यास नकार देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

13 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

19 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

19 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

19 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

20 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

2 दिवस ago