महाराष्ट्र

वैध कारणांशिवाय सासर सोडणाऱ्या पत्नीला पोटगीचा हक्क मिळणार नाही

बिलासपूर: वैध आणि पुरेसे कारण नसताना पती व सासरच्या मंडळींपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलेला पोटगी (Alimony) मिळण्याचा हक्क नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. बिलासपूर येथील कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवत उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

हा निर्णय 27 जानेवारी रोजी बिलासपूर येथील एका रहिवाशाच्या पत्नीने दाखल केलेल्या याचिकेवर देण्यात आला. या याचिकेत तिने कौटुंबिक न्यायालयाने पोटगी नाकारल्याच्या आदेशाला आव्हान दिले होते.

मुख्य न्यायाधीश रमेश सिन्हा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने स्पष्ट केले की, कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशात कोणताही कायदेशीर दोष किंवा बेकायदेशीरपणा आढळून येत नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाकडून हस्तक्षेप करण्याची गरज नाही.

न्यायालयाने पुढे नमूद केले की, पतीने वैवाहिक हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी याचिका दाखल केली असताना पत्नीला पुन्हा सासरी जाऊन वैवाहिक जीवन सुरू करण्याची संधी होती. मात्र तिने ती संधी नाकारली. अशा परिस्थितीत पत्नी पोटगीचा दावा करू शकत नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले.

दरम्यान, संबंधित महिलेने पती आणि सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ झाल्याचा आरोप केला होता. लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत गाडी व 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा तसेच शारीरिक, मानसिक व शाब्दिक छळ झाल्याचा दावा तिने केला होता. मात्र, न्यायालयाने उपलब्ध पुरावे आणि परिस्थितीचा विचार करता पोटगी देण्यास नकार देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

58 मिनिटे ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

1 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

1 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

1 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

1 तास ago

मोदींकडून बारामतीच्या नव्या रेल्वे स्थानकाचे लोकार्पण; पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला मिळाली नवी गती

बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…

1 तास ago