कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ आता खऱ्या अर्थाने रंगात आला असून, घरातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहेत. सदस्यांमधील दडलेले वाद आता उघडपणे समोर येत असून, नुकत्याच समोर आलेल्या नव्या प्रोमोने घरात खळबळ उडवून दिली आहे.या प्रोमोमध्ये दिपाली आणि रुचिता यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध पाहायला मिळत असून, हा वाद इतका टोकाला गेला की संपूर्ण घर अवाक झालं आहे.
वादाचं नेमकं कारण काय?
प्रोमोमध्ये रुचिताने आरोप केला आहे की, दिपालीने इतर सदस्यांसमोर तिच्याबाबत एक गंभीर विधान केल्याचं तिने ऐकलं होतं. रुचिताच्या मते, दिपालीने “रुचिता तू RB ला टच केलं” असं स्टेटमेंट केल्याचं सांगितलं जातंय.मात्र, या आरोपांवर दिपाली चांगलीच भडकलेली दिसते. ती वारंवार ठामपणे म्हणते,“मी तुझ्यावर बोललेली नाहीये! मी नव्हते ती! मी नव्हते ती!”यावर रुचिता देखील मागे न हटता आक्रमक होताना दिसते.
संवादामुळे तणाव शिगेला
वाद वाढत असताना दोघींमध्ये खालीलप्रमाणे तीव्र संवाद रंगतो
रुचिता: हिने असं स्टेटमेंट सगळ्यांना सांगितलं की रुचिता तू RB ला टच केलं.
दिपाली: मी तुझ्यावर बोललेली नाहीये! मी नव्हते ती!
रुचिता: अंगावर चढू नकोस…
दिपाली: तू बोट खाली कर… एक मरेन
रुचिता: हा चल मार!
बोट दाखवणं, अंगावर येणं आणि आवाज चढवणं यामुळे हा वाद अधिकच उग्र बनतो. या घटनेमुळे घरातील इतर सदस्यही गोंधळून गेले असून, कोणाची बाजू घ्यावी हे त्यांनाही कळेनासं झालं आहे.
घरातील समीकरणं बदलणार?
बिग बॉसच्या घरात दररोज बदलणारी समीकरणं आणि वाढता तणाव पाहता, दिपाली आणि रुचिता यांच्यातील हा संघर्ष घराचं वातावरण पूर्णपणे बदलून टाकणार का, की हा वाद आणखी मोठं वळण घेणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.या सगळ्या नाट्यमय घडामोडींचा उलगडा आजच्या भागात होणार असून, प्रेक्षकांसाठी हा भाग नक्कीच उत्सुकतेचा ठरणार आहे.
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…
मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…
जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…