महाराष्ट्र

भारतीय नागरिकत्वाचा ठोस पुरावा म्हणजे ‘आधार कार्ड’ नव्हे…

मुंबई: भारतीय नागरिकत्व म्हणजे केवळ देशात जन्म घेणे नव्हे, तर त्या राष्ट्राशी असलेली एक सखोल ओळख आणि जबाबदारीची बांधिलकी. परंतु आज जेव्हा आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर ओळखपत्रांची इतकी चलती आहे, तेव्हा सामान्य माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न निर्माण होतो “मग खरंच, माझ्याकडे नागरिकत्व सिद्ध करणारं कोणतं कागदपत्र आहे?” बिहारमध्ये मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेमुळे आणि त्यावर झालेल्या न्यायालयीन चर्चेमुळे या प्रश्नाने पुन्हा एकदा महत्त्व मिळवलं आहे.

भारतीय नागरिकत्वसाठी आधार पुरेसा नाही..

आपण दररोज जे आधार कार्ड वापरतो, ते अनेक ठिकाणी ओळख सिद्धसाठी कामी येतं. हॉटेलमध्ये चेक-इन करताना, बँकेत खाते उघडताना, सरकारी सेवा घेताना. पण सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं आहे की आधार हे केवळ एक ओळखपत्र आहे, नागरिकत्वाचा पुरावा नाही. त्याचप्रमाणे, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स, रेशन कार्ड किंवा पॅन कार्ड असलं, तरीही ते तुमचं भारतीय नागरिकत्व सिद्ध करत नाही. यामुळे अनेकांची गोंधळाची स्थिती अधिकच वाढली आहे.

‘ही’ 3 कागदपत्रे महत्वाची

मग नेमकं काय सिद्ध करतं की तुम्ही भारतीय नागरिक आहात? याचं स्पष्ट उत्तर आहे पासपोर्ट, जन्म प्रमाणपत्र आणि मतदार ओळखपत्र ही ती प्रमुख कागदपत्रं आहेत जी तुमचं नागरिकत्व साक्ष देऊ शकतात. उदाहरणार्थ, वैध भारतीय पासपोर्ट हे केवळ प्रवासाचं साधन नसून, तुमची भारतीय नागरिक म्हणून झालेली अधिकृत नोंद दर्शवतो. त्याचप्रमाणे, जन्म प्रमाणपत्र, विशेषतः जर ते भारतात अधिकृतरीत्या नोंदवलेलं असेल, तर ते तुमचं जन्माने झालेलं भारतीय नागरिकत्व सिद्ध करू शकतं.

मतदानाचा अधिकार तर फक्त भारतीय नागरिकांनाच असतो. त्यामुळे मतदार ओळखपत्र हे देखील नागरिकत्व सिद्ध करणारं एक महत्त्वाचं दस्तऐवज मानलं जातं. वयाची 18 वर्षे पूर्ण केल्यानंतरच हे ओळखपत्र दिलं जातं, त्यामुळे ते लहान मुलांसाठी वापरता येत नाही.

‘भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र’ कुणासाठी आवश्यक

याशिवाय, ‘भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र’ हे एक वेगळंच दस्तऐवज आहे, आणि ते फक्त त्यांच्यासाठी असतं जे जन्माने भारतीय नाहीत, पण त्यांनी भारतात येऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर भारतीय नागरिकत्व मिळवलं आहे. म्हणजेच, जन्माने भारतीय नागरिक असलेल्या कोणालाही हे प्रमाणपत्र वेगळं घेण्याची गरज नसते. या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. भारतात नागरिक म्हणून आपली ओळख फक्त आधार किंवा मोबाईल नंबरपुरती मर्यादित नाही. त्या ओळखीच्या मुळाशी, एक मजबूत दस्तऐवज असणं आवश्यक आहे, जे केवळ सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी नाही, तर आपली लोकशाहीतील भूमिका बजावण्यासाठीदेखील अत्यावश्यक आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

17 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

17 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

17 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

17 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

17 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

17 तास ago