डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंनिस यांच्या पाठपुराव्याला यश
नाशिक: पंचवटी येथील नेहा पवार आत्महत्या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे. महिलेच्या सात पानी चिठ्ठीत नमूद केलेल्या गंभीर बाबींचा अभ्यास करून नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ मधील कलम २(क) आणि २(ख) आता प्रकरणात समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही महत्त्वाची कारवाई शक्य झाली.
नेहा पवार यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कौमार्य चाचणी आणि अंधश्रद्धेचा थेट उल्लेख होता. तरीही सुरुवातीच्या एफआयआरमध्ये या मुद्द्यांचा समावेश नव्हता. त्यानंतर अंनिसने पोलिसांना निवेदन देऊन जादूटोणा विरोधी कायद्याची लागू कलमे तातडीने लावण्याची मागणी केली. तसेच डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि नाशिक पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कठोर कारवाईची विनंती केली.
यानंतर तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे सुपूर्त झाली. तपासादरम्यान आरोपीच्या घरातून जादूटोणेसाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांना मिळाले. तसेच चिठ्ठीत नमूद केलेली कौमार्य चाचणी—जी २०१९ मध्ये गृह विभागाने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा घोषित केली आहे—ही बाबही तपासासाठी महत्त्वाची ठरली.सर्व पुराव्यांचा विचार करून पोलिसांनी संबंधित जादूटोणा विरोधी कलमे जोडली. न्यायालयाने पुढील तपासासाठी आरोपींची पोलिस कोठडी ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या निर्णायक कारवाईबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नीलम गोऱ्हे आणि नाशिक पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…