महाराष्ट्र

आत्महत्येच्या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्याची वाढीव कलमे

डॉ. नीलम गोऱ्हे आणि अंनिस यांच्या पाठपुराव्याला यश

नाशिक: पंचवटी येथील नेहा पवार आत्महत्या प्रकरणाला निर्णायक कलाटणी मिळाली आहे. महिलेच्या सात पानी चिठ्ठीत नमूद केलेल्या गंभीर बाबींचा अभ्यास करून नाशिक पोलिसांनी महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा २०१३ मधील कलम २(क) आणि २(ख) आता प्रकरणात समाविष्ट केले आहेत. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही महत्त्वाची कारवाई शक्य झाली.

नेहा पवार यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत कौमार्य चाचणी आणि अंधश्रद्धेचा थेट उल्लेख होता. तरीही सुरुवातीच्या एफआयआरमध्ये या मुद्द्यांचा समावेश नव्हता. त्यानंतर अंनिसने पोलिसांना निवेदन देऊन जादूटोणा विरोधी कायद्याची लागू कलमे तातडीने लावण्याची मागणी केली. तसेच डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि नाशिक पोलीस आयुक्तांना पत्र लिहून कठोर कारवाईची विनंती केली.

यानंतर तपासाची जबाबदारी पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडे सुपूर्त झाली. तपासादरम्यान आरोपीच्या घरातून जादूटोणेसाठी वापरले जाणारे साहित्य पोलिसांना मिळाले. तसेच चिठ्ठीत नमूद केलेली कौमार्य चाचणी—जी २०१९ मध्ये गृह विभागाने डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्यामुळे गुन्हा घोषित केली आहे—ही बाबही तपासासाठी महत्त्वाची ठरली.सर्व पुराव्यांचा विचार करून पोलिसांनी संबंधित जादूटोणा विरोधी कलमे जोडली. न्यायालयाने पुढील तपासासाठी आरोपींची पोलिस कोठडी ३ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. या निर्णायक कारवाईबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने डॉ. नीलम गोऱ्हे आणि नाशिक पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

6 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

6 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

6 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

6 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

6 तास ago