महाराष्ट्र

१०० रुपयांत मिळणार अकरावीत प्रवेश

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक; जाणून घ्या, संपूर्ण माहिती…

संभाजीनगर: राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात केंद्रीकृत प्रवेश प्रणाली लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे विद्यार्थी, पालकांचा वेळ, श्रम व पैसा यामध्ये बचत होणार आहे.

ऑनलाईन नोंदणी कालावधी: १९ मे ते २८ मे २०२५

फीस: फक्त ₹१०० (संपूर्ण राज्यासाठी समान)

अर्ज करण्याचे संकेतस्थळ: https://mahafyjcadmissions.in

ऑनलाईन प्रवेशामुळे काय होणार फायदा

सुलभ प्रक्रिया: घरबसल्या, केव्हाही अर्ज करा

पूर्ण पारदर्शकता: मेरिटवर आधारित प्रवेश

वेळ आणि खर्च बचत: कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची आता गरज नाही. प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.

एकाच पोर्टलवर सर्व माहिती: कॉलेज लिस्ट, वेळापत्रक, निकाल सर्व काही

स्वतःचे प्राधान्य ठरवा: विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार किमान १० कॉलेज निवडू शकतात आणि त्यात बदलही करू शकतात.

दस्तऐवज अपलोड: ओरिजिनल दाखले स्कॅन करून सहज अपलोड करा

गुणवत्तेवर आधारित प्रवेश: सर्वांना मिळणार न्याय्य संधी

विभागीय स्तरावर मिळणार मदतीचे केंद्र:

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मदत

अर्जात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन

आवश्यक कागदपत्रांचे मार्गदर्शन

OTP किंवा पासवर्ड विसरल्यानंतरच्या अडचणी सोडवणे

महत्त्वाचे

प्रवेश प्रक्रिया: शून्य फेरी, ४ सामान्य फेऱ्या, विशेष फेरी

हेल्पलाइन: 8530955564

ईमेल: support@mahafyjcadmissions.in

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर

शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…

13 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण

शिरूर  (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…

13 तास ago

प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…

13 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

15 तास ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

2 दिवस ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

2 दिवस ago