महाराष्ट्र

१०० रुपयांत मिळणार अकरावीत प्रवेश

विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘हा’ हेल्पलाईन क्रमांक; जाणून घ्या, संपूर्ण माहिती…

संभाजीनगर: राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन सुरू करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात केंद्रीकृत प्रवेश प्रणाली लागू करण्यात आली आहे. ज्यामुळे विद्यार्थी, पालकांचा वेळ, श्रम व पैसा यामध्ये बचत होणार आहे.

ऑनलाईन नोंदणी कालावधी: १९ मे ते २८ मे २०२५

फीस: फक्त ₹१०० (संपूर्ण राज्यासाठी समान)

अर्ज करण्याचे संकेतस्थळ: https://mahafyjcadmissions.in

ऑनलाईन प्रवेशामुळे काय होणार फायदा

सुलभ प्रक्रिया: घरबसल्या, केव्हाही अर्ज करा

पूर्ण पारदर्शकता: मेरिटवर आधारित प्रवेश

वेळ आणि खर्च बचत: कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची आता गरज नाही. प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.

एकाच पोर्टलवर सर्व माहिती: कॉलेज लिस्ट, वेळापत्रक, निकाल सर्व काही

स्वतःचे प्राधान्य ठरवा: विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार किमान १० कॉलेज निवडू शकतात आणि त्यात बदलही करू शकतात.

दस्तऐवज अपलोड: ओरिजिनल दाखले स्कॅन करून सहज अपलोड करा

गुणवत्तेवर आधारित प्रवेश: सर्वांना मिळणार न्याय्य संधी

विभागीय स्तरावर मिळणार मदतीचे केंद्र:

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी मदत

अर्जात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन

आवश्यक कागदपत्रांचे मार्गदर्शन

OTP किंवा पासवर्ड विसरल्यानंतरच्या अडचणी सोडवणे

महत्त्वाचे

प्रवेश प्रक्रिया: शून्य फेरी, ४ सामान्य फेऱ्या, विशेष फेरी

हेल्पलाइन: 8530955564

ईमेल: support@mahafyjcadmissions.in

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर Video ! दोन डॉक्टरांचे प्रसंगावधान, दोन तासांची मृत्यूशी झुंज; ४५ मिनिटे अखंड CPR मुळे रुग्णाला जीवदान…

शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा…

2 तास ago

शरीरातून बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्याचा बेस्ट घरगुती उपाय

आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…

4 तास ago

लसणाचे औषधी गुणधर्म

लसणाच्या पाकळ्यात अँटिऑक्सिडंट असतात, जे शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकतात. सूक्ष्मजंतू नष्ट करणारे प्रतिजैविक गुणधर्म…

4 तास ago

‘आपले राष्ट्र, आपला स्वाभिमान’; शक्तिशाली भारतासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन

एकता, कर्तव्य, युवाशक्ती आणि राष्ट्रहिताच्या भावनेतून विकसित भारत घडविण्याचा संदेश मुंबई: भारत हा केवळ भौगोलिक…

5 तास ago

नीट पेपर लीकविरोधात केंद्राच्या कठोर भूमिकेला महाराष्ट्राचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंचे स्वागत

फास्ट ट्रॅक न्यायालये, १० वर्षांपर्यंत कारावास आणि १० कोटी दंडाच्या प्रस्तावित तरतुदींना शिंदेंचा पाठिंबा; विद्यार्थ्यांच्या…

5 तास ago

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजे लढ्याचा शेवट नाही; मोदींनी देशाची माफी मागावी; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असला तरी…

5 तास ago