महाराष्ट्र

लग्नानंतर पत्नीचा नकार; ७ महिने १६ दिवसांत न्यायालयाकडून विवाह रद्द

पतीने मानसिक धक्का बसल्यानंतर घेतली न्यायालयाची धाव

मुंबई: देवाब्राह्मणांच्या साक्षीने व वाजतगाजत पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या विवाहानंतर अवघ्या काही दिवसांत पत्नीने नवरा पसंत नसल्याचा पवित्रा घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आई-वडिलांच्या दबावाखाली लग्न केल्याचे पत्नीने लग्नानंतर तिसऱ्या दिवशीच स्पष्ट केल्याने पतीला जबरदस्त मानसिक धक्का बसला. अखेर न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर अवघ्या ७ महिने १६ दिवसांत कौटुंबिक न्यायालयाने विवाह रद्द करण्याचा आदेश दिला.

राकेश (वय २७) आणि स्मिता (वय २४) (नावे बदललेली) असे या दाम्पत्याचे नाव आहे. राकेश हा व्यावसायिक असून स्मिता गृहिणी आहे. दोघांचा विवाह जून २०२४ मध्ये पारंपरिक पद्धतीने झाला होता. मात्र लग्नानंतर पतीने वैवाहिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असता, पत्नीने थेट नकार दिला. नवरा पसंत नसल्याचे सांगत तिने वैवाहिक जीवन स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली.

लग्नानंतर केवळ २० दिवसांत स्मिता माहेरी गेली आणि त्यानंतर ती परतलीच नाही. पत्नीच्या या भूमिकेमुळे मानसिक तणावाखाली गेलेल्या राकेशने ॲड. राहुल जाधव यांच्यामार्फत मे २०२५ मध्ये न्यायालयात धाव घेतली. पत्नीचा विवाह तिच्या इच्छेविरुद्ध झाल्याने तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी अर्जात करण्यात आली होती.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा विवाह रद्द करण्याचा आदेश दिला.

कधी करता येतो लग्न रद्द करण्यासाठी अर्ज?

हिंदू विवाह कायद्यातील कलम ५ मध्ये विवाहासाठी आवश्यक अटी नमूद करण्यात आल्या आहेत.

या अटींचे पालन न झाल्यास:

कलम ११ आणि १२ अंतर्गत विवाह रद्द करण्यासाठी अर्ज करता येतो

असा अर्ज लग्न झालेल्या तारखेपासून एका वर्षाच्या आत करणे बंधनकारक असते

अर्जावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालय निर्णय देते

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई प्रेस क्लबमधून तीन सदस्यांची हकालपट्टी; भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित बैठक ठरली कारणीभूत

मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…

4 तास ago

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…

4 तास ago

कोल्हापूरात तरुणींवर अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार

सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…

4 तास ago

महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…

5 तास ago

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…

5 तास ago

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…

5 तास ago