मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी तब्बल 7438 उमेदवारांनी आपलं राजकीय भवितव्य आजमावलं.
मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. एकूण 731 जिल्हा परिषद जागांपैकी भाजप 263 जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार शिवसेनेला 156 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 118 जागांवर समाधान मानू शकतो. काँग्रेसला 61 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 48, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 42 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मनसेला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागू शकतं, तर इतर व अपक्ष उमेदवारांना 37 जागा मिळू शकतात.
या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी केलेली युती विशेष चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या युतीचा फारसा फायदा झाल्याचं दिसत नाही. याउलट भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत ग्रामीण भागात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेना आणि काँग्रेसची कामगिरी मिश्र स्वरूपाची राहिली असून काही पारंपरिक गड त्यांनी राखले असले, तरी एकूण बहुमतासाठी त्यांची संख्या अपुरी ठरत असल्याचं एक्झिट पोल दर्शवतो.
दरम्यान, हा एक्झिट पोल केवळ अंदाज असून अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्याच्या आकडेवारीवरून भाजप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं वर्चस्व अधिक मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत.
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…