महाराष्ट्र

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर; भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता

मुंबई: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. राज्यातील 12 जिल्हा परिषदांअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक झाली. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समितीच्या 1462 जागांसाठी तब्बल 7438 उमेदवारांनी आपलं राजकीय भवितव्य आजमावलं.

मतदानानंतर समोर आलेल्या एक्झिट पोलनुसार भाजप राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. एकूण 731 जिल्हा परिषद जागांपैकी भाजप 263 जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार शिवसेनेला 156 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 118 जागांवर समाधान मानू शकतो. काँग्रेसला 61 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला 48, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 42 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मनसेला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागू शकतं, तर इतर व अपक्ष उमेदवारांना 37 जागा मिळू शकतात.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी केलेली युती विशेष चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार या युतीचा फारसा फायदा झाल्याचं दिसत नाही. याउलट भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवत ग्रामीण भागात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे संकेत मिळत आहेत.

शिवसेना आणि काँग्रेसची कामगिरी मिश्र स्वरूपाची राहिली असून काही पारंपरिक गड त्यांनी राखले असले, तरी एकूण बहुमतासाठी त्यांची संख्या अपुरी ठरत असल्याचं एक्झिट पोल दर्शवतो.

दरम्यान, हा एक्झिट पोल केवळ अंदाज असून अंतिम चित्र मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र, सध्याच्या आकडेवारीवरून भाजप राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलं वर्चस्व अधिक मजबूत करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

10 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

10 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

14 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

14 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

14 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

14 तास ago